दरबारी न्यायाचे संबंधानें मुख्य मुद्याच्या चार
१ ( मानसिक धैर्य ) २ (द्रव्यसामर्थ्य) ३ (स्वपक्ष-
पुष्ट पुरावा ) ४ सत्यावर निष्ठा.
आतां प्रत्येक मुद्याचें स्वरूप सांगतों आणि त्यांत
प्रथम मानसिक धैर्य कां असावें आणि तें नसले तर
कोणकोणते तोटे व्हावयाचे ह्याचा विचार करूं.
२ मानसिक धैर्य — तुह्मीच विचार करून पहा
की, आपणास एखादे कृत्य करावयाचें आहे व आ-
पणास त्या कृत्यास लागणारा सरंजाम सर्व कांहीं
अनुकूल आहे परंतु जर मानसिक धैर्य नाहीं तर तें
कृत्य केव्हां तरी आपण सिद्ध करूं शकूं काय ?
फार दूर कशाला आपण रानांत फिरत आहों व आ-
पणाजवळ हत्यार आहे, परंतु शत्रूवर धांवून जाण्याची
किंवा तो अंगावर धांवून आला असतां त्यास हरवि-
ण्याची आपणास हिम्मत नसली तर त्या हत्याराचा
कांहीं उपयोग होईल बरें? नाहीं. ह्मणून हरएक गो-
टीत आपणास यश प्राप्त होण्यास प्रथम मानसिक धैर्यच
असले पाहिजे ! व तें दरवारी न्यायांतही जरूर आहे.
२ द्रव्य सामर्थ्य - प्रथमचें मानशिक धैर्य अ-
स ह्मणजे मग ह्या दुसन्या द्रव्य सामर्थ्याची अवश्य
जरूर आहे, मनुष्यमात्रांस जिवापेक्षांही ह्या लेकीं
द्रव्य अधिक प्यारे आहे ! आपणांत एक साधारण
झटलें आहे किं" चमडी जाय पण दमडी न जाय,,
ह्या गीचा अंतरगामि अर्थ तरी असाच आहे कीं
शरीरास इजा झाली तरी पुरवली पण द्रव्याचा एक