च्छितच नाहीं असें एकच उत्तर सर्वांस मिळत गेल्या-
मुळे ते निराश होऊन परत जात. ! राजाचा असा
जवाब देण्याचा हेतु द्विरर्थी होता. १ एक आपला
पुत्र विवाह केल्यावर विद्येकडे दुर्लक्ष करीत आणि
दुसरे हा जसा गुणी आहे तशीच ह्याच्या साम्यतेची
वधू मिळाली पाहिजे आणि तशी मिळणें हें काम
जरा स्थैर्याचें आहे. ! ! ह्याप्रमाणे कित्येक राजे मद-
नविलासास आपली कन्या देऊन जामात करण्यावि-
षयीं चाहत होते. परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला
नाहीं आणि शेवटीं एक अकल्पित योग येऊन इंदु-
शेखराचा पूर्ण निश्चय असतांही तो मोडून मदनावे-
लासाचें त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षी लग्न झालें.
( मात्र त्या गोष्टींत इंदुशेखराचा एक हेतु तडीस गे-
ल्यासारखें होतें) त्याचा प्रकार असा:-
मांगें सांगितल्याप्रमाणे मदनविलासाची कीर्ति
देशांतरावर जाऊन जो तो राजा त्यास आपली
कन्या देऊन जामात करण्याम चाहत होता; तद्वतच
आपल्या सौंदर्यादि गुणकरून अवंतीनगराच्या
काशीराज नृपाची एकुलती एक कन्या 'चंपकमाला,
ही प्रसिद्धीस आली होतीही. व काशिराजासही अशी
उत्तम गुणवती कन्या कोणास अर्पण करावी ही पूर्वी
पासूनच मोठी काळजी असे, ह्मणून त्यांनी मदनवि-
लासाचे गुणादिक त्याचे कांनीं पडतांच तो त्वरेनें
सुवर्णचपकनगरीस येऊन त्याने मोठ्या विनयाने आणि
चार चौघां थोर मंडळीस मध्यस्थी घालून व चंपक-
माला आणि मदनविलास ह्यांचा जोडा समकत्वामुळें
पान:खानदेश मित्र.pdf/५०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८
विश्रांतिमंदीर.