आपणास हल्लीं स्वतंत्रता आहे व ह्या स्वातंत्र्यांत आ-
पलें मन फाजील कृत्याकडे अवश्य जाईलच, तें न जावें,
आणि मन लागेल त्यावेळींच एखादे कृत्य करावयार्चे
अशी संवय स्वातंत्र्यस्थितीत त्यांस एकदां जर कां
लागली, तर तो पुढे आपण राजपदारूढ झालों,
तरी मोडणें कठिण. ! आणि राजपदारूढ झालेल्या
पुरुषानें स्वछंदीपणाने वागणें हें फारच वाईट
आहे, यास्तव आपला नित्यचा काळ नियमित कृत्या -
कडे विभागिला पाहिजे असें ठरवून त्याने सूर्योदया-
पासून पुन्हां दुसऱ्या दिवशींचा सूर्योदय होई पावेतों
ग्रथित केलेल्या चोवीस कलाकांचे १६ सोळा विभाग क-
रून त्या त्या विभागीं तें तें कृत्य करावयाचें असा क्रम
ठेविला. खाली लिहिल्याप्रमाणे त्यांनी आपला नित्यचा
काळ दरएक कृत्याकडे योजिला असे. (१) अरु-
णोदयाचे सुमारास निजून उठून नित्य कर्मे आटोपणें
( २ ) सूर्योदय होत नाहीं तोंच मित्रासह तालीम-
स्वान्यांत प्रवेश करून दिवसेंदिवस चढत्या प्रकारें
स्वशक्तिमानानें कसरत करणें ( ३ ) सूर्योदयाचे
सुमारास मृगयेस निघून जाणें ( ४ ) प्रहर दिवस ये-
तांच परत घरी येऊन स्नान पूजादिकांत २ दोन घ-
टिक। घालविणें. ( १ ) भोजनोत्तर तांबूल भक्षण वा-
मकुक्षी करण्याकडे २ दोन घटिका ( ६ ) बारावी
घटिका लोटतांच निजून उठून एखाद्या विषयावर स्वचुद्धि-
च्या कोटी लढविण्यांत, नवीन शास्त्रादिकांचा अभ्यास
करण्यास आरंभ करणें ( ७ ) विसावी घडी लोटतांच
आपल्या गुरुवर्ग समतेच्या शिष्टांबरोबर एखाद्या
पान:खानदेश मित्र.pdf/५४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
विश्रातिमंदीर.