३
वरकुल माधवराया,
तववर्ती त्रस्त भाग नगरीचा ॥
यास्तव सोडी मुळिची,
कुमति जी भाग नाशि गोडीचा ॥ ५ ॥
तव पूर्वज ते कसे ? !
काय असे तूं अनर्थ करिशी हे ॥
त्यांस माधवराव ह्या नांवाचा एकच मुलगा झाला होता. तो ल-
हानपणापासून स्वभावतः चाणाक्ष असा होता व बापानें तो एकु -
लता एक असा असताही त्याचे फाजिल लाड न करितां त्यास
सुशिक्षण देऊन आपले पश्चात् हा आपणाप्रमाणेंच खचित सुकीर्ति
•मिळवील असा झाल्यावर आपले काम पाहण्यास दिलें होतें.
मध्यंतरी विसाजीपंताचें कुटुंब ( सावित्रीबाई ) ह्या अकाली मरण
पावल्या होत्या व त्यायोगें विसाजीपंताचें अंतःकरण संसारसुखा
पासून विरक्त होऊन ते काशिक्षेत्राप्रत निघून गेले होते. माधवरा-
वांच्या हाती कोतवालगिरीचे काम असतां बरेच दिवसपर्यंत तें
न्यायनीतीनें केलें होतें; परंतु सुमारें (विसाजीपंतांस काशीक्षेत्रास
जाऊन १० दहावर्षे होण्याचे बेतास ) एक तप होतें न होतें तों
त्यांचे सुवर्तनांत फरक पडतां पडतां फारच पडून तो दुरावर्तनप्रि-
य असा झाला. ह्याचें कारण असें सांगतात कीं, त्या गांवांत त्या-
वेळी बापूराव ह्या नांवाचा एक कुमति ब्राह्मण रहात असून तो
दरिद्री सवत्र माधवरावाचें आश्रयासच नेहमीं असे व त्याचेच उप-
देशाने माधवरावांचे वर्तनांत फरक झाला होता; आणि शेवटीं ते
दोघेही त्या कृत्याचे पायींच मारले गेले होते !! हैं दु:संगतीचें
फळ. ! !