या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आठ : पुनर्जन्माचा बिनतोड पुरावा किती हजार वर्षे झाली कोण जाणे, अयोध्येत दिलीप नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला मल होईना, म्हणून तो व त्याची राणी सुदक्षिणा मात गुरुगृही वसिष्ठाश्रमाजवळ जाऊन राहिली. ऋषीच्या जवळ नंदिनी वाचा एक गाय होती. रोज रानात जाऊन ती चरत असता राजाने तिचे पक्षण करावे व राणीने तिची सकाळ-संध्याकाळ पूजा करावी, असे व्रत गुरूने सांगितले. राजा रोज गायीपाठीमागे रानात जाई. एकदा राजा भोवतालची वनश्री असताना एका सिंहाने नंदिनीवर झडप घातली. राजा धनुष्याला बाण वन सिहाला मारावयाला निघाला, पण त्याच्या हातापायांतली सर्व हालचाल जाऊन एखाद्या पुतळ्याचे जडत्व त्याच्या अंगी आले. मनातल्या " तो रागाने जळू लागला. एवढ्यात सिंह त्याला मनुष्यवाणीने संस्कृतात म्हणाला बाबा राजा, उगीच श्रम घेऊ नकोस. अस्त्राचासुद्धा येथे पाडाव णार नाही. वारा जोराने वाहन झाड पाडू शकेल, पण मोठमोठ्या शिळा तो कशा उलथवील?' आवळ्या नंदीच्या पाठीवर बसणाऱ्या साक्षात शंकराचा मी कुम्भोदर नावाचा अनुचर आहे. सोन्याच्या घड्याने पाणी घाल ____ह तुझ्या पुढ्यात देवदारूचे झाड दिसते आहे ना, ते पार्वतीमाईने या घड्याने पाणी घालून स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढविले आहे. एकदा कोणा तरी रानपशूच्या अंग घासण्यामुळे ह्या झाडाची साल