या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० | गंगाजल म्हणाली, “माझं तिकीट कुाचं आहे. माझ्या नवऱ्याला स्टेशनवर यायला सांगितलं आहे.' तिकीट चेकर म्हणाला, “असं मेलेलं माणूस घेऊन तुम्हांला जाता येणार नाही. आता येईल त्या स्टेशनवर म्हणजे कल्याणवर तुम्हांला उतरून देणार?' हा सगळा प्रकार पाहून मी रदबदली केली. म्हटलं, "कल्याणपासून कुर्ला किती दूर? जाईना का बिचारी गेली तर!" पण तिकीट चेकर ऐकेना. त्या बाईला तिच्या मेलेल्या मुलासकट त्यान कल्याणला उतरविलं. बाई एक शब्द बोलली नाही. तिनं कोणाकडे पाहिल नाही. मुकाट्यानं मुलाला खांद्यावर टाकून ती कल्याणला उतरली. ती उतरून गेली, आणि माझं विचारचक्र सुरू झालं. भांबुडाच्या स्टेशनावर ही माणसं गुपचूप का होती, त्याचं कारण आता मला कळलस वाटलं. ही पहिलटकरीण तरी होती का? पण तिचं मूल खासच आगगाडात बसल्यावर आजारी झालं नव्हतं. त्याचा आजार काही दिवसांचा असणार. त आजारी पडून आता वाचत नाही, असं कळल्यावर त्या लोकांनी तिला १ त्याला नवे कपडे घालून त्यांची घाईघाईनं बोळवण केलेली होती. नवऱ्याशा पोहोचेपर्यंत मूल कदाचित जिवंत राहील, अशीही कल्पना असावा. माहेरच्या माणसांनी का सासूसासऱ्यांनी मरायला टेकलेलं मूल माडीवर देऊन त्याला नव्या कपड्यांनी शृंगारून तिची पाठवणी केली होती. ह्या मुलाला घेऊन काही तासांत ती नवऱ्याकडे पोहोचणार होती. ह्या भयक प्रसंगाला तोंड देऊन ती पोरगी बसलेली होती. माझ्या नसत्या उठाठेव तिला मदत तर झाली नाहीच, पण एका भलत्याच स्टेशनावर उतरविल्यामुळे तिच्यापुढे एक नवीनच संकट उभं झालं, हे मला स्पष्ट दिसून आलं. मल मुंबईला बडा रेल्वे-अधिकारी घ्यायला येणार होता. मी सर्व हकीकत त्याल सांगून त्या बाईला कुर्त्याच्या स्टेशनवर पोहोचवायचीही व्यवस्था कर पण हे सगळं व्हायला दोनचार तास सहज निघन गेले. आमचा नि". जाईपर्यंत ती बाई मुलाला घेऊन कल्याण स्टेशनातच बसली होती. अर मला समजलं. ह्या गोष्टीला कित्येक वर्षे लोटली. अजून मला त्या पोराची किक ऐकू येतेसं वाटतं आणि परत परत मनात येतं की, 'मी माझ्या वेड्या येण्यामुळं त्या बाईला व्यर्थ दु:खात टाकलं. ही कीव त्या बाईबद्दल हो का मला त्या किंकाळ्या ऐकवत नव्हत्या म्हणून स्वत:बद्दल होती, हे सम मजत