या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १२९

आणि भेदरलेली मेंढरें बकरी चोरतात. भील, रामोशी, मांग वगैरेंची शेळ्यामेंढ्या चोरण्याची रीत अशी आहे-एक इसम मेंढवाड्याजवळ तडक जातो व बसतो; आणि बाकीचे १००।१५० कदमांवर राहतात. नंतर तो कडेंचे, मेंढरूं उचलतो व उजवा हात त्याच्या मागच्या पायांमध्ये आणि डावा हात पुढच्या पायांमध्ये घालून त्याची मान अशी दाबून धरतो की त्या मेंढराला 'ब्या' म्हणून करता येत नाही. अशा रीतीने आरडाओरड होईपर्यंत मेंढरें नेऊन ती आपल्या साथीदारांच्या हवाली करतो. चोरलेल्या शेळ्यामेंढ्यांनी ओरडू नये म्हणून मांग, रामोशी, कैकाडी व कातोडी त्यांच्या जिभेला मोठा कांटा टोचतात. चोरलेल्या जनवरांची शिंगें खुडून, त्यांच्या कानांचा आकार बदलून, अगर त्यांना डागण्या देऊन हे लोक त्यांचे स्वरूप असें बदलतात की, ती ओळखतां येऊं नयेत. कैकाडी, वड्डर, कुंचेवाले, कोल्हाटी वगैरे गाढवगोते ( ज्या जाती गाढवांवर बसतात, त्या एकमेकांना एकगोत्री चुलतभाऊ समजतात; असल्या सर्व जातींना गाढवगोते म्हणतात.) कुंभार-परटांची गाढवें चोरतात. हे लोक चोरलेली जनावरें लांब बाजाराला नेऊन स्वस्त भावाने फुकतात, किंवा मारून खातात. कधी कधी ते त्यांना आपल्या सामलातीतल्या खाटकांना अगर त्यांच्या मार्फत विकतात. रोज लागणाऱ्या जिनसा विकत घेण्यासाठी सर्व भटक्ये वाण्यांना आढीच्या दिढी भावानें धान्य देतात. सर्व भिकार जाती मनस्वी कैफ करतात. उद्यांची पर्वा नसल्यामुळे ते तलफेपायीं कलाल वगैरेंना फार स्वस्त दराने धान्य घालतात. भटकणाऱ्या भिकाऱ्यांच्या जमातींच्या वळणांतले कुणबी, वाणी, सावकार ठिकठिकाणी आहेत. त्यांच्याजवळ ते आपले धान्य सांठवितात, आणि कार्यप्रसंगी किंवा आषाढश्रावणांत गरज लागेल त्याप्रमाणे त्यांच्याजवळून चंदी आणतात. ह्यांना टांच बसते ती आषाढ आणि श्रावण महिन्यांत. त्या वेळेला खळी उलगडलेली असतात आणि रानांत कांहीं गवसत नाही, तेव्हां ह्यांना सांठविलेले धान्य उपसण्याची पाळी येते; म्हणून आषाढ-श्रावणाला हे लोक 'मेहुणा ' म्हणतात. मेहुण्यामेहुण्यांची मस्करी आबालवृद्धांस