या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १४७

शेवंती लावू लागले. काहींना स्टेशनच्या फसकींत इतका चट्टा बसूं लागला की, अखेर त्यांना ती मोडावी लागली. साऱ्याच्या हप्त्यांच्या वेळी व त्यांचे मागून होणाऱ्या रासमाथ्यावर धान्य स्वस्त मिळतें; आणि एकदां कां दाणा वाण्याच्या घरी गेला म्हणजे तो सोयीवार मिळत नाही, हा अनुभव आबालवृद्धांस आहे. धान्य वाण्याच्या घरी थांबते तर कदाचित आतांइतकें महाग झाले नसते. हंगामावर गांवचा शेतमाल ( दाणा, चारा, भाजीपाला ) शहर पहातो, आणि टंचाईचे वेळी तोच पुनः शहरांतून खेड्यांत आणावा लागतो; ह्यामुळे व्यापाऱ्यांचा नफा व वहातूक ह्यांचा दुहेरी बोजा हातावर पोट असणाऱ्या गांवढेकऱ्यांवर पडतो. पूर्वी जेथला माल तेथेच ठरे, व लोकांच्या गरजा साध्या व अल्प असत; तेव्हां खेड्यांत पोटापाण्याची ददात म्हणून कशी ती ठाऊक नव्हती. १८९६ चे दुष्काळापूर्वी दाणा चारा, तेल, तूप, गूळ वगैरे जिनसा खेड्यांत स्वस्त्या आणि शहरांत महाग मिळत. तें गाडें आतां फिरलें व ह्या जिनसा खेड्यांतल्या गिऱ्हाइकाला सदैव महाग मिळतात, असा खडतर अनुभव येऊ लागला आहे; आणि खेड्यांतली राहणी शहरांपेक्षां गैरसोयीचीच नव्हे तर महागही होऊन बसली आहे.

 ही झाली शेतमालाची ठोक विल्हेवाट. शेतमाल हे बहुतेक सर्व गांवढेकऱ्यांचें व विशेषतः कुणब्यांचे मुख्य नाणे असते. म्हणून घे पदरांत शेतमाल, आणि आण लागेल ती जिन्नस, असा बाराही मास त्यांचा व्यवहार चालतो. कुणब्यांचे राहणें गांवांत फारसें पडत नसल्यामुळे बाजार बहुधा कुणबिणी करतात, आणि ह्या कामांत कुणबिणीचे अनुकरण तिच्या ब्राह्मणेतर भगिनींनी केले आहे. अनेक वेळां असें दिसून येते की कारभाऱ्याला नेसावयाला धोतर घ्यावयाचे असते, पण दुकानांत त्याच्यापेक्षा कारभारीणच हडसून खडसून बोलते. वरिष्ठ म्हणविणाऱ्या जातींत बायकांना दारचे वारें माहीत नसल्यामुळे वैधव्यदशेत जशी त्यांची बुडवणूक होते आणि मध्यस्थांची पोळी पिकते, तशी मागासलेल्या जातींच्या बायकांची स्थिति होत नाही. पूर्वीची समाजबंधनें तुटलेल्या