पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/12

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ गीतारहस्य अथवा कर्मयोग Tवले आहेत. तथापि शास्त्रीय व गहन विषयांची चर्चा थोडक्या शब्दांनीं करणे नेहमींच कठिण असून, या विषयांचा मराठी परिभाषाहि अद्याप कायम झालेली नाही; म्हणून भ्रमानें, नजरचुकीनें, किंवा अन्य कारणांनीं, आमच्या या नवीन त-हेच्या विवेचनांत काठिन्य, दुर्बोधता, अपुरेपणा किंवा दुसरे दोषहि रहाण्याचा संभव आहे हें आम्ही जाणून आहों. परंतु भगवद्गीता वाचकांस अपरिचित आहे असे नाहीं. गीता पुष्कळांच्या नित्यपाठांतली असून तिचे शास्रीयदृष्टया अध्ययन केलेले व करणारेहि पुष्कळ लोक आहत. यासाठी अशा अधिकारी पुरुषांस आमची अशी विनंति आहे की, त्यांच्या हातांत हा ग्रंथ पडून त्यांत वरीलप्रेकारचे कांहीं दोष त्यांचे नजरेस आल्यास त्यांनी ते मेहेरबानीनें आम्हांस कळवावे, म्हणजे त्यांचा विचार करून या ग्रंथाची द्वितीयावृत्ति काढण्याचा प्रसंग आल्यास त्यांत योग्य ती दुरुस्ती करण्यांत येईल. आमचा कांहीं विशिष्ट संप्रदाय असून तत्सिद्धयर्थ आम्ही गीतेचा एक प्रकारचा विशिष्ट अर्थ करितों अशी कित्येकांची समजूत होण्याचा संभव आहे. यासाठी येथे एवढे सांगितले पाहिजे कीं, गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्याहि विशिष्ट व्यक्तीस किंवा संप्रदायास उद्देशून लिहिलेला नाही. आमच्या बुद्धीप्रमाणे गीतेच्या संस्कृत श्लोकाचा जो सरळ अर्थ होतो तेो आम्हीं दिला आहे. असा सरळ अर्थ केल्यानें,-आणि हल्लीं संस्कृताचा बराच प्रसार झाला असल्यामुळे अर्थ सरळ आहे की नाहीं हें पुष्कळांस सहज़ कळण्यासारखें आहे,-त्यांत जर कांहीं सांप्रदायिकपणा येईल तर तो गीतेचा आहे, आमचा नव्हे. “मला दोनचार मार्ग सांगून घोटाळ्यांत न पाडितां, त्यांपैकी जो श्रेयस्कर असेल तो एकच निश्चयेंकरून सांगा” (गी. ३. २; ५.१) असा अर्जुनाचा भगवंतांस स्पष्ट प्रश्न असल्यामुळे, गीतेंत कांहँीं तरी एकच विाशष्ट मत प्रतिपाद्य असले पाहिजें हें उघड आहे (गी.३.३१) व तें कोणतें हें मूळ गीतेचाच अर्थ करून निराग्रहबुद्धीनें आम्हांस पहावयाचे आहे; प्रथम कांहीं तरी मत कायम करून, त्याला गीता जुळत नाहीं म्हणून गीतार्थाची ओढ़ाताण करावयाची नाहीं. सारांश, गीतेचे खरोखरच जें रहस्य आहे,-मग तें कोणत्याहि संप्रदायाचे अगर पंथाचे असो,-त्याचा गीताभक्तांत प्रसार करून भगवंतांनींच अखेर म्हटल्याप्रमाणे हा ज्ञानयज्ञ करण्यास आम्हा प्रवृत्त झाले आहॉ; व आम्हांस अशो उमेद आहे की, त्याच्या अव्यंगतासिद्धयथै वर मागितलेली ज्ञानभिक्षा आमचे देशबंधु व धर्मबंधु आम्हांस मोठ्या आनदान घालतील, प्राचीन टीकाकारांनीं प्रतिपादिलेले गीतेचे तात्पर्य आणि आमच्या मताप्रमाणे गीतेचे रहस्य यांत भेद कां पडतेो याची कारणे गीतारहस्यांत सविस्तर सांगितली आहत. परंतु गीता-तात्पर्यासंबंधानें जरी याप्रमाणें मतभेद असला तरी