पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/15

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना १५ व्यैग राहिले असल्यास तें दाखविण्याचे काम रा. रा. हरि रघुनाथ भागवत यांनीं एकट्यांनींच केलेलं आहे. अर्थात् याच्या मदतीखेरीज हा ग्रंथ इतक्या लवकर केवळ आमच्या हातूनच प्रसिद्ध होणे शक्य नव्हते. म्हणून या सर्वांचे मन:पूर्वक येथे आभार मानिले पाहिजेत. सरतेशेवटी चित्रशाळी छापखान्याचे मालक यांनी हें काम काळजीनें व शक्य तेवढे लवकर छापून देण्याचे पत्करून त्याप्रमाणे तडीस नेल्याबद्दल त्यांचेहि आभार मानणें जरूर आहे. शतांत पीक आले तरी त्याचे अन्न तयार होऊन खाणाराच्या मुखांत पडेपर्यंत अनेक लोकांच्या साहाय्याची जशी अपेक्षा लागत्ये तद्वतच कांहीं अंशीं ग्रंथकाराची-निदानपक्षीं आमची तरी-स्थिति आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. म्हणून वरील प्रकारें आम्हांस साहाय्य करणाच्या सर्व लोकांचे-त्यांचीं नांवें वर आलेलीं असोत वा नसोत-आम्ही पुनः एकवार आभार मानून ही प्रस्तावनु संपवितों. प्रस्तावना संपली. आतां ज्या विषयाच्या विचारांतें आज पुष्कळ वर्ष घालविलीं व ज्याच्या नित्य सहवासानें व चिंतनानें मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला, तो विषय ग्रंथरूपानें हातानिराळा होणार म्हणून वाईट वाटत असलें तरीहे विचार-साधल्यास सव्याज, नाहीपेक्षां निदान जसेच्या तसे-पुढील पिढीतील लोकांस देण्यासाठीच आम्हांस प्राप्त झाले असल्यामुळे, वैदिक धर्मातील राजगुह्याचा हा परीस ‘उत्तिष्ठत ! जाग्रत ! प्राप्य वरान्निबोधत !”--उठा ! जागे व्हा ! आणि (भगवंतांनी दिलेले) हे वरसमजून घ्या !-या कठोपनिषदांतील मंत्रानें (कठ. ३.१४) प्रेमोदकपूर्वक आम्ही होतकरू वाचकांच्या हवालों करितों. यांतच कर्माकर्माचे सर्व बीज आहे; आणि या धर्माचे स्वल्पाचरणहि मोठ्या संकटातून सोडवितें, असें खुद्द भगवंताचंच निश्चयपूर्वक आश्वासन आहे. यापेक्षां आणखी जास्त काय पाहिजे ? “केल्याविण कांहाँ हात नाहीं” हा सृष्टीचा नियम लक्षांत आणून तुम्ही मात्र निष्कामबुद्धीनें कर्ते व्हा म्हणजे झाले. निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीनें संसार करून थकल्याभागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ, किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनहि, गीता सांगितलेली नसून संसारच मोक्षदृष्टया कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारांतलें खरें कर्तव्य काय याचा तात्त्विकदृष्टया उपदेश करण्यासाठीं गीताशास्राची प्रवृत्ति झालेली आहे. म्हणून पूर्व वयांतच गृहस्थाश्रमाचे किंवा संसाराचे हें प्राचीन शास्र जितक्या लवकर समजून घेणे शक्य असेल तितक्या लवकर प्रत्यकानें समजून तल्याखेरीज राहूं नये, एवढीच आमची शेवटीं विनंति आहे. " पुणें, अधिक वैशाख शके १८३७. बाळ गंगाधर टिळक.