पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/63

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा. ३१ विवचनेंत पडून मनुष्य वेडा होऊन जातो. अर्जुनावरचा प्रसंग यांतलाच होता: पण अर्जुनाखेरीज दुसच्या थेर पुरुषांसहि असल्या अडचणी कशा येतात याचे महाभारतांत पुष्कळे ठिकाणी मार्मिक विवेचन आहे. उदाहरणार्थ, मनूनें रार्व वर्णास सामान्य म्हणून सांगितलेल्या “अहिंसा सत्यमस्तेयं शैौचमिंद्रियनिग्रह.”-अहिंसा सत्य, अस्तेय, काथावाचामनाची शुद्धता, आणि इंद्रियनिग्रह (मनु.१०.६३)-या पांच सनातन नीतिधर्मापैकीं अहिसेचीच गोष्ट आपण घेऊं. “अंहिसा परमो धर्मः” (मभा, आ.११.१३)हें तत्त्व आपल्या वैदिक धर्मौतच नव्हे, तर इतर सर्व धर्मातहि मुख्य गाणलें आहे. बौद्ध व ख्रिस्ती लोकांच्या धर्मग्रंथांत ज्या आज्ञा आहेत त्यांत “हिंसा करूं नका” या आज्ञस मनुप्रमाणेच पहिलें स्थान दिलेले आहे. हिंसा म्हणजे नुस्ता जीव घेणेच नव्हे, तर दुस-या प्राण्याचे मन किवा शरीर यांस इजा करणें याचाहेि त्यांत समावेश होतो. अर्थीत् अहिंसा म्हणजे कोणत्याहि सचेतन प्राण्यास कोणत्याहि प्रकारें न दुखविणें होय. पितृवध, मातृवध, मनुष्यवध, हे हिंसेचेच घोर प्रकार असून जगांतील सर्व लोकांच्या मतें ही अहिंसाधर्म सर्व धमौत श्रेष्ट मानिला जातो. पण आतां असें समजा कीं, आपला जीव घेण्यास किंवा आपल्या पत्नीवर अगर कन्येवर बलात्कार करण्यास, अथवा आपल्या घरास आग लावण्यास, अगर आपली सर्व दौलत व स्थिरस्थावर हरण करण्यास एखादा दुष्टमनुष्य हातांत शस्र घेऊन सज्ज झाला व जवळ दुसरा कोणीहि त्राता नाही, तर असल्या ‘आततायी’ मनुष्याची आपण “अहिंसा परमो धर्मः” म्हणून डोळे मिटून उपेक्षा करावी, किंवा या दुष्टास-तो सामोपचारानें ऐकत नसल्यास-यथाशक्ति शासन करावें ? मनु म्हणतो— . ২ ● गुरु वा बालवृद्धा वृा ब्राह्मण वा बहुश्रुतम्। अीततायिनमायान्तं हृन्यादेवाविवायेन् ॥ ‘असला आततायी म्हणजे दुष्ट मनुष्य-तो गुरु आहे, म्हातारा अगर पोर आहे, का विद्वान् ब्राह्मण आह, इकडे न पहातां-बेशक ठार करावा !” कारण अशा वेळीं हत्येचे पाप हत्या करणारास लागत नसून, आततायी आपल्या अधर्मानेंच मारिला जातो, असें शास्रकर्तम्हणतात(मनु ८.३५०). मनूनेंच नव्हे, तर अर्वाचीन फौजदारी कायद्यानेंहि आत्मसंरक्षणाचा हा हक्क कांहीं मर्यादांठेवून कबूल केला आहे. अशाप्रसंगीं अहिंसेपेक्षां आत्मसंरक्षणाची योग्यता अधिक समजतात. भ्रूणहत्या म्हणजे केंॉवळया पेोरांची हत्या सर्वात अति गह्य मानिली आहे; पण आडवे आलें म्हणजे कापून काढावयास नको काय? यज्ञांतील पशुवध वेदानेंहि प्रशस्त मानिला आहे(मनु.५.३१); तथापि पिष्टपशुकरून तोहि एकवेळ टाळतां येईल (मभा. शां. ३३७; अनु.११५.५६). परंतु हवेंत, पाण्यांत, फळांत वगैरे सर्व ठिकाणीं जे