पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



   कै.सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी.














   करें काया झिजवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।

   चटक लावून सोडावी । कांहीं एक ॥ - रामदास.

 श्रीसमर्थांनी जेव्हां हा उपदेश लिहिला तेव्हां त्यांचा उद्देश हा उपदेश

महाराष्ट्रीय जनांनीं आदरावा असा असावा. कारण दासबोध ग्रंथ लिहिण्याचा

मूळ हेतु प्रत्यक्षतः शिवाजी व तत्कालीन त्यांचे इतर शिष्य यांस राजकीय व

पारमार्थिक उन्नति शिकवावी व परोक्षतः इतर सर्व महाराष्ट्रीयांसही सद्बोध

करावा असा होता, ही गोष्ट सर्वसंमत आहे. आपल्या उपदेशाप्रमाणे वागणारे

कांही लोक निघतील व यथाशक्ति आपल्या देशाचे पांग फेडतील, व स्वतः

कृतार्थ होऊन दुसऱ्यासही कृतार्थ करतील, असे समर्थास वाटले असावें, व

त्याप्रमाणें आज दोनशे वर्षांत समर्थांचे शिष्य ह्मणवून घेण्यास योग्य असे कांहीं

पुरुष निपजले, व पुढेही निपजतील. नुसता भगवा पटका बांधला व हातांत कुबडी