कै.सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी.
करें काया झिजवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लावून सोडावी । कांहीं एक ॥ - रामदास.
श्रीसमर्थांनी जेव्हां हा उपदेश लिहिला तेव्हां त्यांचा उद्देश हा उपदेश
महाराष्ट्रीय जनांनीं आदरावा असा असावा. कारण दासबोध ग्रंथ लिहिण्याचा
मूळ हेतु प्रत्यक्षतः शिवाजी व तत्कालीन त्यांचे इतर शिष्य यांस राजकीय व
पारमार्थिक उन्नति शिकवावी व परोक्षतः इतर सर्व महाराष्ट्रीयांसही सद्बोध
करावा असा होता, ही गोष्ट सर्वसंमत आहे. आपल्या उपदेशाप्रमाणे वागणारे
कांही लोक निघतील व यथाशक्ति आपल्या देशाचे पांग फेडतील, व स्वतः
कृतार्थ होऊन दुसऱ्यासही कृतार्थ करतील, असे समर्थास वाटले असावें, व
त्याप्रमाणें आज दोनशे वर्षांत समर्थांचे शिष्य ह्मणवून घेण्यास योग्य असे कांहीं
पुरुष निपजले, व पुढेही निपजतील. नुसता भगवा पटका बांधला व हातांत कुबडी