या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना

  • तव पादसरोरुहीं स्वचित्त

भ्रमरातें रस चाखवूनि गोत्रं तुज भक्त तुझे सदैव गाती, मृग आम्हा गुणगातसक्त हावः' (मास्फुका ४॥१८३) गीतींत बहुशः यमक असेंच दुस-या आणि चौथ्या पादांच्या अन्तीं साधलेले असतें; परन्तु दोनदोन चरण सलग अवका ओळींत देण्याच्या पद्धतीमुळे ही गोष्ट ध्यानांत येत नाही. गीतींत लागोपाठ चरणांच्या अन्तीं यमक जुळविल्याचीं झुदाहरणे दुर्मिळ आहेत

  • सोडुनि माझा घोडा

दोघेहि हस्त या क्षणीं जोडा. शरणागत’, म्हणवा रे याचि झुपायें समर्थभय वारे”. (मोकुल १३॥१६) वीरेश्वराने आपल्या गजमुखचरित्रांत यमकें अशीच जुळविली आहेत

  • देझुनि निरोप अमररां

झुठला तो औीश जावया समरा; त्या जगदवलम्बातें दे नन्दी निजकरावलम्बातें.” (वीगच ८) आर्यागीतींत यमकं अशी म्हणजे पहिल्या आणि दुस-या, तेिस-या आणि चौथ्या चरणांच्या अन्तीं साधिलेलीं रविकीतींच्या काळापासून आढळतात. दोन वा कचित तीन चरणांहून अधिक चरण सोडून यमक साधू नये यमक केवळ डोळ्याला दिसून त्याचा तितका उपयोग नाही. तें कानाला कळलें पाहिजे. * पूर्वानुभवसंस्कारबोधिनी यद्यदूरता, हा दण्डीने अनुप्रासाच्या बाबतीत धातलेला दण्डक यमकाच्या बाबतीत अवश्य पाळायला हवा. दुस-या जोडीदा राची गाठ पडेपर्यन्त पहिल्याचें स्मरण रहायला पाहिजे. चरण आखूड अस ल्यास पहिल्या आणि चौथ्या वा पांचव्या चरणांच्या अन्तीं यमक चालेल; परन्तु चरण दीर्घ असल्यास यमकांचाहि दूरान्वय होण्याची भीति असते. यशोधनां (पृ. ७६) शार्दूलविक्रीडितरचनेत पहिल्या चरणाचे यमक आठव्य चरणाशी जुळविलें आहे !