श्री. ग. माजगावकर यांसी
स. न. वि. वि.
काल वर्षप्रतिपदा शके १८९९ च्या शुभदिनी महामहिम राष्ट्रपती महोदयांनी ‘आणीबाणी' संपूर्णतः उठविल्याचे ऐकून माझ्या मनात प्रामुख्याने जो विचार आला तो आपले मन:पूर्वक अभिनंदन करण्याचा. गल्या वर्षप्रतिपदा शके १८९८ पासून आपण तत्कालीन ‘आणीबाणीला' आव्हान देऊन माझी लेखमाला प्रसिद्ध करावयाला सुरुवात केलीत. त्यानंतर कहाणीचे पुस्तक छापलेत-त्यातील प्रास्ताविकासकट छापलेत, हे आपले धाडस सार्थकी लागले. आणीबाणीला आव्हान देण्याचा ध्वज आपण गेल्या वर्षी उभा केलात आणि या वर्षी गुढ्या तोरणे बांधून कालचा पाडवा साजरा केलात असेच मला वाटत आहे. आपल्या प्रकाशनाचे वैशिष्ट्य असे की, आपले हितकर विचार लिहावयासाठी विदूषकी साज न चढवता आपले विचार लिहिता येतात, लेखन ऋजु आणि मऊ असून त्यात विलक्षण दाहकता आणता येते हे 'माणूस' च्या पानोपानी जाणवते. आपले हे वैशिष्ट्य आणि धाडस नेहमी वर्धिष्णु राहो हीच देवाजवळ प्रार्थना!
कळावे लोभ असावा ही वि.
पु. ल. इनामदार, मुंबई
खरी गोष्ट अशी आहे की, 'माणूस' ने इनामदारांसारख्या लेखकांचे आणीबाणीतील कामगिरीबद्दल प्रथम आभार मानायला हवेत. अशा लेखकांची साथ नसती तर १८।१९ महिने चाललेल्या आणीबाणीत स्वतंत्र विचारांचा पाठपुरावा करणारे लिखाण सातत्याने 'माणूस' मधून देत राहणे, निर्भयता प्रकट करणे एरव्ही कठीण गेले असते.
आणीबाणीच्या काळात 'माणूस' मधून आलेले स्वतंत्र बाण्याचे लिखाण एकत्रित