आहे, त्यांची काय गुजर लोकांनवर ठेव थोडी आहे अशा इतर अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. भेटीअंती खुलासा होईल पण या गोष्टी शींगदाणे फोडणाऱ्या बायांच्या तोंडून आयकले आहे तसेच दादा सजातीय गुजर लोक गावात अशी अफवा उठवत आहेत की पुष्कळ माणसे आपण जिरवून दिलेत तर हा कुठे मोठा लिडर वाया चालला आहे की तो आपल्याने जिरणार नाही केव्हाही शक्य आहे मिनिस्टर पाडवी दिगंबर नरसि यांना जिरवून दिले तर याची काय कथा. लीडर मारू शकतो तर हा आपल्या मानाने शुल्लक मनुष्य आहे तर आपण सावधान राहावे कारण दादा गावात अशी चर्चा प्रत्येक पाडळदे गावातील गुजर लोकांच्या घरी चालत असते कारण तो सध्या भूदानमध्ये फुकटाचे खाऊन आणि मुंदडाजीचा बगलबच्चा राहून तो फार उंटावरचा शहाना झाला आहे याला कारण सर्व भूदान आहे नाहीतर त्याने मुळीच शहाणपणा केला नसता पण असो काही हरकत नाही असे वातावरण पाडळदे गावात सजातीय गुजर लोकांच्या घरी चालतात कळावे. दादा फार लिहावेसे वाटते पण भेटीअंती जास्त बोलत येईल पत्राचे उत्तर ताबडतोब करावे.
आपला विनित
ठाकरे (परशराम)
पत्राखाली डाव्या बाजूला अंबरसिंगने आपल्या हस्ताक्षरात नोंदलेला एक शेरा - ‘दिगंबर पाडवी मृत्यूचा उल्लेख आहे'
आदिवासींवरील अन्याय आणि अंबरसिंगकडे येणारे असे तक्रार अर्जाचे ढीग, दोन्हीही वाढत होते.
- शाळेसाठी वर्गणी हवी. यात भिल्लांवर सक्ती !
- शाळेत भिल्ल- आदिवासी मुले बसत नाहीत, वसू दिली जात नाहीत !
- केलेल्या कामाची मजुरी मागण्यासाठी भिल्ल घरी आला.मालकाने तोंडात दिली.
-पिकाची चोरी केल्याबद्दलचे कठोर प्रायश्चित्त-आदिवासींच्या झोपड्यावरची कौले, घरातले सामानच काढून आणले.
--शंभर शंभर आदिवासी कुटुंबांना मुलाबाळांसकट दहशतीमुळे गाव सोडून, शहाद्याजवळच्या नदीच्या पात्रात बेवारशासारखे वर्ष वर्ष राहावे लागले.
--मारझोड आहे, दमदाटी-शिवीगाळ आहे, प्रसंगी बहिष्कार टाकून कोंडीही केली जात आहे.