पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/146

हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेळी तीच समस्या कायम आहे... पाण्याची टंचाई व कामाची मागणी. या भागातला दुष्काळ कायमचा कमी व्हावा म्हणून काही ‘लाँगटर्म प्लॅनिंग' केलं आहे का तुम्ही?'

 त्याचा हा रोखठोक प्रश्न आणि आक्रमक सूर पालकमंत्र्यांना अपेक्षित नसावा. त्यांनी प्रदीपचं नाव, गाव व पेपर कोणता हे विचारून घेतलं आणि मग घसा साफ करीत ते उत्तरले,

 'चांगला प्रश्न आहे. दुष्काळ जर कायमचा हटवायचा असेल तर जतसंवर्धनाला पर्याय नाही. शिवाय शेतक-यांनी शेतीबरोबर फळबागा आणि दूध-कुक्कुटपालनासारखे जोडधंदेही स्वीकारले पाहिजेत...'

 ‘ह्या सान्या योजना आजही अस्तित्वात आहेत; पण गावपातळीवर त्याचं एक्झिक्युशन कसं होणार? आणि ते कोण करणार?'

 त्यासाठी कार्यकर्ते हवेत, चांगले अधिकारी - कर्मचारी हवेत आणि आपल्यासारखे जागरूक पत्रकारही हवेत.'

 पालकमंत्र्यांचा ‘ब्रीफिंग' नंतर हॉटेलमध्ये प्रदीपला काही सीनियर पत्रकारांनी सांगितलं, 'भाई, असे दौरा हे मौजमजेसाठी आहेत. 'ब्रीफिंग'च्या वेळी त्यांना अडचणीत आणायचं नसतं. बाबा, जे सांगितलं ते ऐकायचं.!'

 'मला हे नाही पटत, बाबा. आपण काही त्यांचे प्रसिध्दी अधिकारी नाहीत. खोलात जाऊन काही प्रश्न विचारणे व माहिती जमवणे हा आपला हक्क आहे. प्रदीपनं उत्तर दिलं.

 ‘जाने दो यार... अभी अभी आया है इस फिल्ड में... धीरे धीरे सीख जायेगा...' एकानं म्हटलं, 'शाम गांव में जाने का है। कुछ हिमरू शॉल लेने के है...!"

 'उद्याच्या दुष्काळाची पाहणी झाल्यावर परवा वेरुळ - अजिंठा - पैठणची ट्रीपही त्यांनी अरेंज केलीय...'

 आणि बघता बघता सारे पत्रकार ट्रिपच्या गप्पात रंगून गेले. प्रदीपही . त्यांच्यापासून अलग होत गेला.

 दुस-या दिवशी त्यांच्या दुष्काळ पाहणी दौ-यात माहिती अधिकारी आणि तालुक्याचे तहसीलदार होते. प्रदीपला त्यांच्याकडे पाहाताना चेहरा ओळखीचा वाटत होता; पण नेमकं स्मरत नव्हतं.

 मिनी बसमध्ये प्रदीपच्या जवळच तहसीलदार येऊन बसले. तेव्हा त्यांनीच विचारलं, 'मला ओळखलं नाही का? मी भुजंग पाटील. साता-याला आपण कॉलेजला

पाणी! पाणी!! / १४४