हे पान प्रमाणित केलेले आहे.

सवयींचा मोठा वाटा असतो. मुलांच्या सवयी आणि आपण' या पुस्तकात मुलांच्या, पाल्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात सवयींचं महत्त्व व त्यांना योग्य वेळी योग्य दशा व दिशा देणं यास महत्त्व देऊन त्यांची विवेचना, विश्लेषण, मार्गदर्शन करण्यात आलं आहे. यज्ञिता राऊत यांनी पाल्यजन्म ते विकास असा पट योजून पालकांना आपल्या पाल्याच्या सवयींना आकार, सकारात्मकता देऊन पाल्याचे व्यक्तिमत्त्व संस्कारी, सद्गुणी व सत्प्रवृत्त करण्यास साहाय्य केलं असल्याने हे पुस्तक सुजाण पालकांसाठी बाल विकासाचा कानमंत्र ठरलं आहे.

 ‘मुलांच्या व्यक्तिमत्त्वासाठी उत्तम शिक्षण कोणते' या पहिल्या प्रकरणात त्यांनी मुलांना समजावून घेऊन निरपेक्ष देण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. महत्त्वाचं सूचन ठळकपणे लक्षात आणून दिलं आहे. छायाचित्रांचा उपयोग करून त्यांना तुम्हाला जे सांगायचं, सुचवायचं आहे ते प्रभावीपणे सादर केले आहे. ती या पुस्तकाची जमेची बाजू असून त्यामुळे हे पुस्तक बोलकं हितगुज बनून जातं. यात लेखकाची भूमिका एका समजूतदार समुपदेशकाची आहे व ती मला अधिक महत्त्वाची वाटतं. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे हा या प्रकरणात मिळणारा मंत्र पाल्याच्या विकासात परिणामकारी आहे. मुलांना वेळ देणं या वर्तमान व्यस्त, यांत्रिक जगात किती महत्त्वाचं आहे हे लेखिकेनं पटवून दिलं आहे. या लेखनातलं सूचन सकारात्मक, पालकांचा आत्मविश्वास वाढवणारं व पालकांना सक्रिय करणारं आहे. पाल्यात पालकांचे सर्व त-हेनं गुंतणं म्हणजे सांभाळ, संगोपन हे या प्रकरणातून पुरेपूर लक्षात येतं.

 ‘नक्की काय आहे, जे बदलायचं आहे?' मध्ये नेमकेपणाने लेखिका अधोरेखित करते. त्यासाठी पालकांचं आत्मपरीक्षण,स्वयंमूल्यमापन महत्त्वाचं. पालकांनी मुलांना देण्यापूर्वी आपल्यात काय आहे, काय नाही याचा शोध, धांडोळा घ्यायला हवा. 'Know thyself' हे बायबलचं सूत्र असो वा । ‘कोऽहं' हे भारतीय तत्त्वज्ञानाचं ब्रीद असो, सर्वांत आत्मशोध महत्त्वाचा. तो काय एकदा बोध झाला की पाल्याला आपण काय देऊ शकतो, काय नाही ते कळतं. त्यासाठी पाल्याचे निरीक्षण, नोंद महत्त्वाची ठरते. निरीक्षणाचा पडताळा महत्त्वाचा.गणिताचं उत्तर बरोबर का हे पडताळ्यातूनच ठरतं तसंच पाल्यांच्या सवयीसंबंधी आपल्या निष्कर्षांचं असतं हे लेखिका जाणते.त्यातून ती तुम्हास पाल्य घडणीचा वस्तुपाठ देते. त्यामुळे हे पुस्तक मार्गदर्शक बनलं आहे. त्यात तात्त्विक चर्चेपेक्षा वर्तमान संदर्भातील व्यवहार्य तोडगे, उपाय असल्यानं ते अधिक प्रत्ययी झालं आहे. उदाहरणार्थ

प्रशस्ती/१४१