या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


मुली दुर्मीळ झाल्या हो (कथासंग्रह)
बाबूराव शिरसाट
प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - मार्च, २०१६
पृष्ठे - १०४ किंमत - १२0/

______________________________________________

स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा समाज जागर घडविणाच्या कथा


 ‘मुली दुर्मीळ झाल्या हो' हा वर्तमान समाजाचा आकांत आहे. माणसाच्या विकासात शिक्षण नेहमीच विधायक भूमिका वठवत राहते असे नाही. मिळालेल्या बुद्धी नि शिक्षणाचा माणूस कधी कधी गैरवापर करतो किंवा स्वार्थ, अदूरदर्शितेमुळे चुकीच्या निर्णयास कारणीभूत होतो. वर्तमान भारताची जनगणना आपणास सांगते आहे की देशातील स्त्री-पुरुष जन्मप्रमाण विषम होत चालते आहे. पुरुषांच्या तुलनेने स्त्री जन्मप्रमाण कमी होते आहे. कारण काय तर समाजाचा स्त्रीविषयक अनुदार दृष्टिकोण. परंपरेने भारतात स्त्रीस दुय्यम स्थान मिळत आले आहे. पूर्वी तिला घरी, दारी, समाजात कुठेही मानाचे स्थान नव्हते. तिला अधिकार, हक्क नव्हते. ती पुरुषाची सोबतीण, सावली होती. भोग्या इतकेच तिचे स्थान. पण समाजात शिक्षण, देशाटन, उद्योग, व्यापार, देवाणघेवाण इ. मुळे बदल होत जाऊन स्त्रीला मन असते, भावना असतात. तिला अधिकार असतात. ती विचार व निर्णय करू शकते हे समाजसुधारकांनी विविध समाज विज्ञानाच्या प्रगती आधारे दाखवून दिले व स्त्रीशिक्षणास गती आली. स्त्री शिक्षित, कमावती झाली पण समाजाच्या पुरुषी मानसिकतेत बदल न झाल्याने स्त्री विषयक समाजधारणेत म्हणावा तितका बदल झाला नाही.
 याचे मूळ होते समाज प्रचलित विवाह पद्धतीत मुलीच्या लग्नास हुंडा

प्रशस्ती/१८५