या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


संवाद मनाशी (वैचारिक)
डॉ. वासुदेव देशिंगकर अभिनंदन
प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशन - मे, २०१६
पृष्ठे - १५२ किंमत - रु. २५0/

_____________________________________

मोहाच्या क्षणी विवेकाची कसोटी


 येशू ख्रिस्ताने लिहिलेल्या 'बायबल'चे एक सूत्रवाक्य आहे, 'Know thyself. स्वतःला जाणा. ही मोठी अवघड गोष्ट आहे खरी. पण तितकीच ती आवश्यक नि अनिवार्यही खरी! डॉ. वासुदेव देशिंगकरांनी लिहिलेले पुस्तक ‘संवाद मनाशी' याची प्रचिती देतं. मनुष्याच्या जीवनाचा उतार सुरू झाला की तो मागे वळून पाहू लागतो. गाडी उताराला लागली की शहाणा माणूस ब्रेकवर पाय ठेवतो. पण गाडी चढत चढत असते तेव्हाही खरं तर ब्रेकवर पाय ठेवण्याची गरज असते. अन्यथा, ती दरीत कोसळण्याची भीती नि शक्यता. पण माणूस त्यावेळी क्लचवर पाय ठेवून असतो. गाडी नि जीवन रेटत असताना जे ब्रेक सांभाळतात त्यांच्या जीवनाला उत्तरायणात झळाळी येते.
 लेखकाने आपल्या मनोगत' मध्ये स्पष्ट केल्यानुसार हे पुस्तक त्यांचं ‘अनुभव संचित' होय. पासष्ट वर्षांच्या गेल्या आयुष्यात त्यांनी कर सल्लागाराची भूमिका निभावली. अनेक संस्थात कार्य केलं. सिनेमासारख्या आळवावरचं पाणीही त्यांनी चाखलं आहे. जीवनाचे कृष्ण शुक्ल पक्ष पाहिलेला माणूस वानप्रस्थात संन्यस्त जरी झाला नसला तरी समाधिस्त होत असतो. जगापासून अलिप्त राहू लागला की त्याचा मनाशी संवाद सुरू होतं. हे पुस्तक त्या अवस्थेचं अपत्य होय. यात त्यांनी तीस लेखात मनात

प्रशस्ती/१९५