________________
महायुद्ध(काव्यसंग्रह)
वसंत भागवत ________________________________________
अनुभवांचे युद्ध आणि अभिव्यक्तीची सुबोधता
‘महायुद्ध' हा वसंत भागवत यांचा काव्यसंग्रह. त्या संग्रहातील कविता म्हणजे कवीच्या जीवन, अनुभव, विचार, दृष्टीची अनुभूती आणि अभिव्यक्तीही. हा कवी, त्याचा माझा परिचय नाही. कवीची खरी ओळख त्याची कविताच असते. या सूत्रानुसार समजून येणारा कवी दलित अनुभव घेऊन जगणारा. त्याला आपण खालच्या जातीत जन्मल्यानं उपेक्षा, अपमान, अत्याचार सहन करावे लागले असे त्यांची कविता परोपरीने वाचकास समजावते. त्यामुळे ‘जात व्यवस्था' नाकारून तो मनुष्य व्यवस्था स्वीकारतो, रुजवू पाहतो ही त्याच्या जीवनाकडे पाहण्याच्या सकारात्मक वृत्तीचे निदर्शक आहे. ‘जात पुसायची आहे म्हणणारा हा कवी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसदार आहे. जातिसंस्थेचे उच्चाटन ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, “जातीमुळे आर्थिक क्षमता वाढते असे नाही. जातिव्यवस्थेने ना पूर्वी कधी वंशविकास केला ना ती या पुढे करू शकेल! जातिभेदाने एक गोष्ट मात्र निश्चित केली. तिने हिंदू समाजाचे पूर्णतः विघटन केले आणि नैतिक अधःपतनही! (पृ. ५८) समाज जीवनात पदोपदी जातीच्या आधारे माणसाचं मूल्यमापन, स्वीकार, नकार ठरतो याचं कवीस शल्य आहे. जातनिरपेक्ष प्रेम समाज अद्याप स्वीकारत नसल्याची खंत कवीस आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह