हे पान प्रमाणित केलेले आहे.

 म्हणून जेव्हा आपली व्यथा व्यक्त करते तेव्हा लक्षात येते, बुद्ध नि आंबेडकर आले नि गेले तरी जोवर माणसांचे हृदय परिवर्तन होत नाही तोवर धर्म परिवर्तनास अर्थ उरत नाही. ही कविता माणसाचे मारीच होणं थांबवायचा आग्रह करते. ते जेव्हा होईल तेव्हाच कवी विजय शिंदे यांचा टाहो थांबेल.

 या पुस्तकाचे प्रकाशन प्रज्ञा प्रकाशनचे प्रा. शरद गायकवाड यांनी करून मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी या कवीचा ‘जयभीम गीतमाला' हा काव्यसंग्रह यापूर्वीच प्रकाशित केला आहे. प्रा. शरद गायकवाड हे प्रज्ञाशील असून, व्यथाशीलही असल्याचे त्यांच्या या अक्षर चळवळीवरून स्पष्ट होते. त्यांचे अभिनंदन!

◼◼


दि. १४ नोव्हेंबर, २००६
बालक दिन

प्रशस्ती/४८