हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाकळ्या फुलविण्याची क्षमता घेऊन येते.

सुरुवातीस असू आम्ही
उमलणाच्या कळ्या
ज्ञानवसा लाभताच
फुलतील पाकळ्या
 तीत संस्कारांचा नंदादीप सतत तेवत असतो हे ‘पणती’ सारखी कविता वाचली की लक्षात येतं. 'ज्ञानदीप' मधील ‘गाऊ भारत गान', ‘भारत देश महान', 'एक फूल - एक झाड' सारख्या कविता देशप्रेम शिकवितात. तर 'येईल मेघराजा', 'निसर्गाशी प्रेम करा रे', 'चांदोबाला आमंत्रण', सारख्या कविता पर्यावरण संरक्षणाचं भान देतात. या कवितात ‘नवता' ही अनेक अंगांनी सामोरी येते. यातल्या घड्याळाची किल्ली गायब आहे. त्याला लागतो ‘सेल' चा खाऊ. यातली मुलं भाजी-भाकरी खातात तसं फास्टफूडही चाखतात. यातला पंखा लोडशेडिंगमुळे लहरी झालाय. यातले ढग मुलांची बालसुलभ जिज्ञासा चपखलपणे व्यक्त करतात.
गडगडणाच्या ढगात आई
कोण वाजवी ढोल?
एवढ्या ऊंचावरून त्यांचा

जात नाही का तोल?
 असं विचारणारी कविता मुलांची कधी होते ते कळतसुद्धा नाही. इथल्या चांदोबाला लपायला लिंबोणीचं झाड उरलं नसल्याची खंत वाचली की माणसानं निसर्ग कसा ओरबाडून टाकलाय, ते प्रकर्षाने लक्षात येतं. नुसता निसर्गच नाही तर आपला सांस्कृतिक विध्वंसही हा कवी ‘मामाचा चिरेबंदी वाडा' जमीनदोस्त झाल्याचं वास्तव रेखांकित करतो नि मन सुन्न होतं.
 ‘ज्ञानदीप' मधील कविता एकाच वेळी रंजक असते व प्रबोधकही। असं आगळं रसायन लाभलेली ही अपवाद कविता. तिच्या शब्दकळा सराईत नाहीत. कवितेत बालसुलभ तालाचा तिला अजून रियाज नाही. ती पहिली बाललीला आहे. तिच्यात बाललीलेचं सारं लालित्य आहे, अद्भुतता आहे. कालसंगत अभिनवपण हे ‘ज्ञानदीप' चं खरं वेगळेपण. त्यामुळे ही कविता बालवाचकांना भुरळ घालेल. त्यांच्या मनाची मरगळ दूर करणारी विनोदची लकेरपण त्यात आहे.


पंखेदादा फिरून तुम्हा
येत नाही का चक्कर?
प्रशस्ती/६३