या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनवाणी (आत्मकथन)
अंकुश गाजरे
रावा प्रकाशन, कोल्हापूर
प्रकाशन - मार्च, २०११
पृष्ठे - २०२ किंमत - रु. २00/
________________________________
परिस्थितीवर मांड ठोकणारं आयुष्य


 ‘अनवाणी' ही आहे अंकुश गाजरे यांची आत्मकथा. शेळ्या पाळून उपजीविका करणाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गरिबी, अज्ञान यांच्याशी दोन हात करत वाढणारं सात जणांचं कुटुंब जगवताना आई-वडिलांची होणारी त्रेधातिरपीट वाचत असताना वाटत राहतं की, असं दारिद्र्य कुणाच्याच वाट्याला येऊ नये. शेळ्या पाळताना डोंगर-दच्या पायी तुडवाव्याच लागतात. मग काटेकुटे तुडवत होणारा प्रवास म्हणजे रोज नवा पराक्रम अशीच स्थिती... या परिस्थितीत साधं पायी चप्पल आलं तरी विमान प्रवासाचं सुख लाभावं असा दिलासा देणारा क्षण...
 देवडे गावी पाचरुटाच्या छपरात आई-वडील आपल्या पाच मुलामुलींसह संसार ओढत दिवस काढत होते ते एकाच आशेवर... मुलं मोठी होतील, शिकतील व हे दिवस सरून जातील. अंकुन्या, आबी, कबी, मनुताई आणि लह सारी पोरं गुण्यागोविंदानं ताटात पडेल ते खाऊन आनंदात असायची. आई - वजानानी व वडील - परमानाना साच्या गावचे नाना-नानी होते. एक मासा सर्व मिळून खात. गुढीपाडव्याला पूजेला नारळ आणणं पण दुरापास्त असायचं. देवळातला नैवेद्य चोरून खात पोट भरणारी पोरं... कण्यांवर दिवस काढायची... भटकायची... शेळ्या हाकायची!
 एकदा एक गुरुजी अंकुन्याला भेटतात... त्याच्या कानात शाळेचं


प्रशस्ती/७९