पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/137

हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक बुजुर्ग गांधीवादी पत्रकार त्याला म्हणाले,

 ‘साहेब, हे प्रकरण म्हणजे टिप ऑफ आइसबर्ग आहे. तुम्ही हिंमत दाखवली, संभाव्य बदनामीची पर्वा केली नाही म्हणून हे प्रकरण लोकांपुढे आलं. खरंच, शेतकरी व गाववाल्यांच्या ललाटीच्या रेषा ब्रह्मदेव बदलणार नाही, एवढ्या सहजतेनं तलाठी हा प्राणी बदलत असतो. एकवेळ अफगाणी पठाणाची सावकारी परवडेल, 'शोले'मधल्या गब्बरसिंगसारख्या डाकूचे अत्याचार सहन होतील, पण त्याही पलीकडे, भारतात तलाठी नामक प्राण्याची जी मगरमिठी शेतकरी व जमीन मालकांवर बसली आहे, ती असह्य आहे. तसं पाहायला गेलं तर तलाठी हा वर्ग तीनचा कारकून समकक्ष कर्मचारी, पण त्यांच्या हाती गावाच्या जमिनीच्या नोंदीचे अधिकार असतात. पूर, दुष्काळ, आग, आदि नैसर्गिक आपत्ती, मृत्यूअपघात बाबतचे पंचनामे करण्याचे तो काम करीत असतो व त्यावरच तर बाधित व्यक्तींना शासकीय मदत, अनुदान वा कर्ज मिळत असते. त्यामुळे ग्रामीण जीवनात तलाठ्याचे स्थान एकमेवाद्वितीय असे झालेले आहे. छोटे पण मोठे अधिकार असले की, माणसाची बुद्धी पण भ्रष्ट होते, माणूस बहकला जातो हे चिरंतन सत्य आहे. त्याप्रमाणे काही हाताच्या बोटावर मोजणारे अपवाद सोडले, तर सारे तलाठी एकजात चालूगिरी करतात, हे निर्विवाद सत्य आहे. कुणाही शेतक-याला सातबारा (जमीन व पिकाच्या नोंदीचा दस्तऐवज) व वारस, खरेदीनं बदलणारी मालकीची फेरफार नोंदीची प्रत सहजपणे, वेळेवर न पैसे देता मिळाली असं एखादं उदाहरण मला पहायला - अनुभवायला मिळालं तर धन्य वाटेल... पण आकाशाला कधी फूल येतं का?"

 बापूसाहेबांचं हे सडेतोड विवेचन ऐकताना चंद्रकांतला शरम वाटत होती. ज्या महसूल यंत्रणेचाच आपण एक भाग आहोत, त्या यंत्रणेचा एक भाग असलेल्या तलाठ्याबद्दल चुकूनही कोणी चांगलं बोलत नाही. तो अस्वस्थ होत ऐकत होता. मग हलकेच तो म्हणाला,

 “बापू, आपला शब्द न शब्द खरा आहे! ज्या देशात सत्तर टक्के लोक शेतकरी आहेत, तिथं जमिनीचं मोल अपार असतं. त्यामुळे मालकी हक्क, कब्जा, वहिवाट, पीक नोंदी, कर्ज नोंदी आणि कृषी जीवनाशी संबंधित पूर, दुष्काळाच्या वेळी मदत वाटप याला अपार महत्त्व आहे. हे सारे अधिकार तलाठ्याकडे एकवटलेले आहेत व महसुली कायदे, तशीच अपील प्रक्रिया किचकट व वेळखाऊ आहे. लोक सोशिक व शांत आहेत, त्यामुळे तलाठ्यांच्या वर्चस्वाला कोणी प्रश्नांकित करीत नाही."

 "तालुक्यातील सब रजिस्ट्रारला हाती धरल्यामुळे प्रत्येक खरेदी-विक्री

१३६ । प्रशासननामा