पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/१५

हे पान प्रमाणित केलेले आहे.
सावकाराचे भयंकर गणित
अनुभव ९

 एकदा भीमाचा बा आजारी पडला दवाखान्यात न्यावे लागणार होते कदाचित डॉक्टर दवाखान्यात भरती पण करून घेतील असे वाटत होते. जायचं दवाखान्यात तर चार पैसे बरोबर हवेतच....पण जवळ पैसे नव्हते ... काय कराव काही सुचेना शेवटी भीमा म्हणाली 'देईल का बँक मला पैसे? फार नको पण ५००० मिळाले तरी चालतील' ...भीमा म्हणाली , ‘आजारपणाला बँक कर्ज देत नाही'... शेवटी काही सोय होईना म्हणून तिने शेवटी सावकाराला कर्ज मागितले ५००० रुपये पैसे मिळाले पण व्याज कापून हातात ४५०० पडले पण त्यासाठी तिने शेताचा एक तुकडा लिहून दिला. तो तुकडा अगदी छोटा फक्त ५ गुंठ्याचा होता. पैसे परत केले की लगेच सोडवून घ्यायचा होता. दवाखाना झाला एका दिवसात सलाईन भरून सोडलं पण जाणे-येणे, डॉक्टरची, फी औषध धरून ४५०० झालेच! बा घरी आला पण त्या धकाधकीत महिना कधी संपला कळलंच नाही. सावकार दारात हप्त्याला उभा राहिला. पण पैसे नव्हते सावकाराने माफ केलं पण म्हणाला मुद्दलाला जोडतो.
 त्यादिवशी ५००० रुपयाचे व्याज धरून मुद्दल झाले ५५००/- पुढच्या महिन्यात १०% दराने व्याज झाले ५५०/- पण तेही नव्हते मग पुन्हा मुद्दल वाढली ६०५० झाली मग व्याजही वाढत गेले ६०५ झाले. सोबतच्या तक्त्यात भीमाचे व्याज कसे वाढत गेले बघा.
 न परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज घेतल्यामुळे भीमाचे म्हणता म्हणता व्याज वाढत गेले आणि शेवटी २ वर्षात सारी ५ गुंठे जमीन सावकाराला द्यावी लागली. तिला व्याज काढता येत नव्हते त्यामुळे अशी शेती विकावी लागली..... पण तिने ती शेती जर पहिल्यांदाच विकली असती तर जमिनीचे ५०,०००/- मिळाले असते आणि आजाराचा ५०००/- खर्च करूनही ४५,०००/- उरले असते. ‘पैसे येतील' या आशेचा आर्थिक फटका बसला नसता. असे अनेकांचे होते. त्यांना वाटते सावकाराने फसवले पण तसे नसते १0% महिन्याला व्याज हे कधीच परवडणारे नाही हेच मुळात समजत नाही. हे समजत नसल्याने अनेक शेतकरी आपली शेती किरकोळीत गमावून बसतात म्हणून आर्थिक साक्षर झालेच पाहिजे!
 नाहीतर समजतच नाही की ४५००/- रुपये हातात पडले अशा कर्जाचे २ वर्षात १० पट कसे होतात!