या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__केकावूलि. २२३ ५रस पिला न निष्ठुरपणे, कृपा करुनि ते भवीं तारिले;। जैगजनक तं, मुलें सकळ जीव, यां भातुकें इँटावुनिहि देशि बा ! अमृत नेदिजे घातुकें. ॥ ९० । वैरी प्रगट शांतिला धरि, परंतु मीना बंकी सर्व दुष्ट लोक संसारपाशांतून मुक्त होऊन भगवत्स्वरूपीं मिळून गेले. तेव्हा तुम्हीं त्यांना मारिले हा त्यांच्यावर अपकार झाला नसून उलट उपकारच झाला. ईश्वराच्या हातून मृत्यु पावलेले राक्षस संसारसागरांत तरले:-रामाने खरदूषणत्रिशिरांचा संहार करून शूर्पणखेला विरूप केली हे ऐकून, आपणासह सर्व राक्षसकुळांचा नाश करण्याकरितां ईश्वरच रामरूपाने अवतरला आहे असे रावण मनांत समजला व राम जर परमात्म्याचा अंश असेल तर त्याच्या हातून मरण आल्याने मला वैकुंठाचे राज्य मिळेल, नाहीं तर राक्षसांचे राज्य भोगावयास सांपडेल असा विचार करून, तसेच रामरूपी भगवान् आपल्यावर लवकर सुप्रसन्न व्हावे म्हणून रामाशीं विरोधभक्तीने वागण्याचा रावणाने निश्चय केला. ह्या प्रसंगींच्या रावणाच्या विचारांचे प्रतिबिंब अध्यात्मरामायणांतील पुढील श्लोकांत सुरेख दृष्टीस पडते. ते वरील श्लोकाच्या स्पष्टीकरणार्थ उपयुक्त जाणून आम्ही वाचकांस सादर करितों:-यद्वा न रामो मनुजः परेशो मां हंतुकामः सबलं बलौघैः । संप्रार्थितोऽयं द्रुहिणेन पूर्व मनुष्यरूपोऽद्य रघोः कुलेऽभूत् ।। ५९ ॥ वध्यो यदि स्यां परमात्मनाहं वैकुंठराज्यं परिपालयेऽहम् । नो चेदिदं राक्षसराज्यमेव भोक्ष्यं चिरं राममतो व्रजामि ।। ६० ।। इत्थं विचिंत्याखिलराक्षसेंद्रो रामं विदित्वा परभेश्वरं हरिम् । विरोधबुद्ध्यैव हरिं प्रयामि द्रुतं न भत्तया भगवान्प्रसीदेत्. ।। ६१ ।। [अरण्यकांड-सर्ग ५]. हरिवंशांत शंकर कृष्णाला ह्मणतातः-‘नामचि घेतां पोटीं घालुनि अपराध सकळ वळलास । करिसि अरिसि निजसम तू बा ! कंसीं काय न कळवळलास'. । (५०.८७). । १. संसारांत. ‘भवीं तारिले'=त्यांच्या अपराधांचा त्यांस यथान्याय दंड देऊन सुक केले. २. जगाचा उत्पन्नकर्ता बाप. ३. खाऊ. द्वितीयाचा अर्थः—ईश्वरापासून सर्व जगाची उत्पत्ति झाली असल्यामुळे तो जगाचा पिता असून सर्व प्राणिमात्र त्याचीं लेंकरें होत. ह्या लेकरांच्या कल्याणाकरितां कधीं कधीं ईश्वराला त्यांना शासन करून भय दाखवावे लागते, तरी शासनानंतर त्याच्यापासून जीवरूय लेकरांना खाऊ अर्थात् सद्गतिच प्राप्त होते. तेव्हां ईश्वर जीवांविषयी निर्दय नसून सदयच आहे. कारण ज्याला दुसन्याचा घात करावासा वाटतो असा मनुष्य त्याला अमृत कदापि देणार नाही. तेव्हा दुसन्यास अमृत देणारा मनुष्य त्याचा घात करण्यास कधीही इच्छिणार नाहीं. ईश्वर रावणकंसादि लाखों दुष्टांचा संहार करून शेवटी त्यांना अमृत (मोक्ष) देतो म्हणून तो त्यांचा घात करणारा नव्हे, उलट तो त्यांचा सदय पिताच आहे. ४. दपटशा देऊन, धाक दाखवून. ५. मोक्षः (पक्षी) सुधा. ६. घातक्याने. ७. प्रास्ताविकः-‘अमृत नेदिजे घातुके' असे जे मागे सामान्य विधान केले त्याचे या केकेंत उदाहरण देऊन कवि समर्थन करतात. . अत्रयाथः-बकी (बगळी) वरी (बाह्यात्कारी) प्रकट (स्पष्ट, उघड) शांतिला (शांतर