पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/63

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०

करावी, अशी वारंवार विनंति केली. परंतु त्यांना दत्तक पुत्र घेण्याची गोष्ट पसंत पडेना. ते वारंवार ह्मणत की, "माझी पत्नी जर राज्यकारभार चालविण्यास समर्थ आहे, तर मला स्वतःस दत्तक घेण्याची काय अवश्यकता आहे?" अर्थात् महाराजांचे हे उत्तर ऐकले ह्मणजे त्यांच्यापुढे एक अक्षरही काढण्याची कोणाची प्राज्ञा नसे.
 दौलतराव शिंदे ह्यांस रखमाबाई व बायजाबाई ह्या दोन बायका होत्या. पैकीं वडील रखमाबाई ह्या फार साध्याभोळ्या व निरुपद्रवी अशा असून, राज्यशकट चालविण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगीं मुळींच नव्हतें. बायजाबाई ह्या शहाण्या, राजकारणी, धूर्त, प्रसंगावधानी, आणि दृढनिश्चयी अशा होत्या; व त्यांनी आपल्या पतीस राज्यकारभार चालविण्याचे कामीं पुष्कळ वर्षें साहाय्य केलें होतें. त्यामुळें महाराजांस सर्व राज्यकारभार बायजाबाईंचे स्वाधीन करावा अशी इच्छा वाटणें साहजिक आहे. परंतु तसें केल्यानें, कदाचित् दरबारांतल्या कित्येक कारस्थानी व कुटिल लोकांस, हिंदुशास्त्राप्रमाणें रखमाबाईचा पक्ष घेऊन, तंटेबखेडे करण्यास संधि सांपडेल, व त्याचा परिणाम संस्थानास विनाकारण भोगावा लागेल, ह्मणून त्यांनीं ह्या प्रश्नाचा निकाल स्पष्ट रीतीनें कांहींच केला नाहीं. बायजाबाईवर त्यांची अत्यंत प्रीति होती; व राज्य चालविण्यास लागणारें सामर्थ्य व इतर गुण त्यांच्या अंगीं वसत होते; ह्याचा त्यांनीं अनुभवही घेतला होता. एवढेंच नव्हे, तर स्त्रिया ह्मणजे


 १ मिल्ल साहेबांनी आपल्या इतिहासांतही ह्याचा उल्लेख केला आहेः-

 "The real cause of his reluctance, however, was his attachment to Baiza Bai, who had long exercised an imperious influence over his mind, and to whom he wished to bequeath the substantial authority of the state, although the opposition of the principal persons of his court, and probably some misgivings of the result, deterred him from declaring her his successor."-Mill's History of India, Vol. IX; Page 146.''