या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
" कमले ' संबंधी लोक काय बोलतात ?
"ज्ञानप्रकाश, " ता. २१८।२२:-
" विवाह ठरणें तो वधूवरांच्या संमतीनें व पसंतीनेच ठरला पाहिजे ही गोष्ट सिद्ध करण्याचा लेखकांनी या कादंबरींत प्रयत्न
केलेला आहे. कादंबरी वाचनीय झाली आहे. "
“ स्वराज्य " - २१/९/२२:-
" ही एक स्वतंत्र सामाजिक कादंबरी असून समाजहितदृष्ट्या या कादंबरीचा उपयोग विशेष होण्यासारखा आहे."
रा. रां. गोविंद कृष्ण टिळक ( वकील, बार्शी ) आपल्या (ता.२|८|२२ च्या पत्रांत लिहितात:-
" आपण आपली कादंबरी नजर म्हणून मला दिली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.
पुस्तक वाचलें. तासभर चांगली करमणूक झाली. आपलें उद्दिष्ट कार्य यशस्वी होवो " इ.