पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

कृषिगोरक्ष्यवाणिज्य लोकानामिह जीवनम् |—-शां. ८९.७

शेती, गोरक्षण, व व्यापार यावरच जगाची प्राणयात्रा अवलंबून आहे हे सत्य महाभारतकार कधीहि न विसरल्यामुळे वैश्यांचीही महती त्यांनी कमी लेखलेली नाही. राजाने कृषिवाणिज्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे नारदाने युधिष्ठिराला केलेल्या बोधावरून स्पष्ट होईल. नारद म्हणाले, “युधिष्ठिरा, राष्ट्रातील कृषी निवळ पर्जन्याच्या पाण्यावर अवलंबून असू नये. शेतकीसाठी मोठमोठे तलाव विशिष्ट अंतरावर नित्य उदकाने परिपूर्ण राहतील अशी व्यवस्था करावी. अशी व्यवस्था तू केली आहेस ना ? हे नरश्रेष्ठ कृषीचा उत्कर्ष व्हावा यासाठी कृषीवलांची सुस्थिती राखण्याकडे राजाने लक्ष पुरविले पाहिजे. त्याजपाशी पोटगी व बीभरणा भरपूर आहे की नाही याची राजाने चवकशी करावी व एकोत्रा व्याजापेक्षा अधिक व्याज न घेता त्यास कर्ज द्यावे. बा धर्मा, तू हीच पद्धती ठेविली आहेस ना ?"
 वैश्यांचे महत्त्व भारतीय तत्त्ववेत्त्यांना किती वाटत होते हे दुसऱ्या एका प्रकाराने कळून येईल. राजाने अमात्य कोणचे व कसे नेमावे हे सांगताना भीष्मांनी सांगितले आहे की विद्यानिष्ठ प्रौढ, शुचिर्भूत असे चार ब्राह्मण अमात्य असावे. शस्त्रधारी, बलिष्ठ असे अठरा क्षत्रिय अमात्य असावे आणि

वैश्यान् वित्तेनसंपन्नानेकविंशति संख्यया
त्रींश्च शूद्रान् विनीतांश्च शुचीन् कर्मणि पूर्वके ।

-शां. ८५.८

 धनसंपन्न असे एकवीस वैश्य तुझे अमात्य असावे. त्याचप्रमाणे नित्यकर्माचरण करून शुचिर्भूत झालेले तीन शूद्र अमात्य असावे