पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील समाजकारण
५७
 

 अमात्यपदी बहुसंख्य वैश्य असावे असे सांगितले आहे. त्यावरून त्यांचे राष्ट्रात कोणते स्थान होते ते कळून येईल.
 शूद्रासंबंधी मात्र भारतीयांच्या मनांत समतेची भावना नाही. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्याबरोबरीला त्याला त्यांनी आणलेला नाही. तो त्रैवर्णिकांचा दास आहे असेच मत आहे. पण यासंबंधी एक गोष्ट लक्षांत वागविली पाहिजे. आज हिंदुस्थानात शेतकऱ्यांचा वर्ग फार मोठा आहे. त्यांना कोणतेही कारण नसताना शूद्र लेखण्यात येते हे अगदी अशास्त्रीय व धर्मविरुद्ध आहे. कृषिगोरक्ष्य करणारे ते सर्व लोक वैश्य आहेत व वेदाध्ययन, यज्ञ, वेदोक्तकर्म यांचा त्यांना आजच्या ब्राह्मणांइतकाच अधिकार आहे. तेव्हा शूद्र म्हणताच त्यांचा विचार डोळ्यांपुढे आणणे हे अयुक्त होय. त्याहून जे इतर राहिले ते शूद्र होत. त्यांच्याबद्दल भारतीयांना समतेची भावना नव्हती हे वर सांगितलेले आहेच. पण आज समाजात त्यांच्याबद्दल जी हीन भावना आहे तीही त्या काळीं नव्हती असे म्हणण्यास वाटेल तितकी प्रमाणे आहेत. महाभारत वाचताना असे निश्चित वाटू लागते की शूद्रांनाही हळूहळू या समाजात सामील करून घेऊन कालांतराने त्यांना एकजीव करून घ्यावे असेच धोरण भारतीयांचे होते.
 शूद्राने सत्य, अहिंसा, दान इत्यादी धर्माचे प्रतिपालन केले तर तो शूद्र ब्राह्मणाच्या बरोबरीचा होतो असे धर्म, पराशर, भृगू इ. थोर तत्त्ववेत्त्यांचे मत होते हे वर सांगितलेच आहे. त्याचप्रमाणे प्रधान निवडताना तीन शूद्र प्रधान राजाने निवडावे असे भीष्मांनी सांगितल्याचेही वर आलेच आहे. पण शूद्राना संन्यास यज्ञयाग व तप ही निषिद्ध नाहीत, विहित आहेत असेही भारती तत्त्ववेत्त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेले आढळते.