[ भाग
झाला असल्यास, किंवा, त्याचें वेळींच शासन झालें नाहीं
तर तो डोईजड होईल असें वाटत असल्यास,त्याचें
पारिपत्य अवश्य करावें. मात्र, आपलें व शत्रूचें बलावल
जाणून, व अमात्य, सैन्य, आणि धनादि सामग्री, यांचे
चांगले पाठबळ असल्या कारणानें आपली खचित सरशी
उचितकाली शत्रु-
वर चाल.
होईल, असें वाटत असल्यास लढा-
ईच्या भरीस पडावें; आणि उचित-
काल पाहून शत्रूवर हल्ला करावा.
तदनंतर सपाट जागी अश्वरथादि साधनांनी युद्ध क-
रावें. अथवा, उदकावृतस्थानांत गजनौकादिक साधनांनी,
किंवा, वृक्षादि लतांची गर्दी असल्यास चापेकरून,
आणि उघड्या ठिकाणी, ढाल तलवारीने लढण्याची सर्व
तयारी असावी.
सैन्यांत लढण्यासाठी जे लोक ठेवावयाचे ते धिप्पाड, व
१ मार्गशीर्ष शुभे मासि यायाद्यात्रां महीपतिः ।
फाल्गुनं वाथ चैत्रं वा मासौ प्रतियथाबलम् ॥ १८२ ॥
अन्येष्वपि तु कालेषु यदा पश्येद्भुवं जयम् ।
तदा यायाद्विगृह्यैव व्यसने चोत्थिते रिपोः ॥ १८३॥
५ स्यन्दनाश्चैः समे युद्धेदनूपे नौद्विपैस्तथा ।
वृक्षगुल्मावृते चापैरसिचर्मायुधैः स्थळे || १९२ ॥
(मनुस्मृति. अ. ७ ).