पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

२७

आर्यांची राज्यव्यवस्था.

साठीं, पैशाची मदत भरपूर पाहिजे. सबब आपल्या प्रजावर्गीपैकीं कोणाकडून किती करभार घेणें अवश्य आहे, हें यथान्याय ठरविण्यास, त्याने काळजीपूर्वक झटावें. राजानें कोणापासून किती घ्यावें याविषयीं मनु- स्मृतींत चांगलें विवेचन केले आहे.
मूळच्या ठवांत सुवर्णादि मौल्यवान् धातु, रत्नादिमणि धंदेवारी प्रमाण कराचा यथान्याप विभाग. आणि अश्वादि पशु, यांची जी भर प्रतिवर्षी पडेल, तिचा (१/२०) एक पन्नासांश; जे धान्य पिकेल त्याचा, ( जमिनीच्या मगदुराप्रमाणे व प्रसंगास अनुसरून ), (१/१२) एक बारांश, (१/८) एक अष्टमांश, किंवा (१/६) एक शष्ठांश; पत्रे, शाक, तृण, वृक्ष, मांस, मध, घृत, गंध, औषधि, रस, पुष्प, मूल, चर्मपदार्थ, आणि मृत्तिकेची व दगडाची भांडी, इत्यादिकांवर (ई) एक शष्ठांश; व्यापार करणाऱ्यांकडून त्यांच्या वर्षाच्या प्राप्तीप्रमाणे थोडा बहुत


१ पंचाशद्भाग आदेयो राज्ञा पशुहिरण्ययोः ।

धान्यानामष्टमो भागः षष्ठो द्वादश एव वा ॥ १३० ॥
२ आददीताथ षड्भागं द्रुमांसमधुसर्पिषाम् ।
गंधोषधिरसानां च पुष्पमूलफलस्य च ॥ १३१ ॥
पत्रशाकतृणानां च चर्मणां वै दलस्य च ।
मृन्मयानां च भांडाना सर्वस्याश्ममयस्य च ॥ १३२ ॥
3 यत्किचिदपि वर्षस्य दापयेत्करसंज्ञितम् ।

व्यवहारेण जीवंतं राजा राष्ट्रे पृथग्जनम् ॥ १३७ ॥

( मनुस्मृति अ. ७ ).