या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषापेपत्ति, ध्वनि, शब्द, च श्रवणविचार. ६५ औत्पत्तिकस्तु शब्दस्यार्थेन संबंधस्तस्यज्ञानमुप- दशोऽव्यतिरेकश्चार्थेनुपलब्धेतत् प्रमाणंबादरायण स्थान पेक्षत्वात् ॥५॥ ( मीमांसादर्शन, अ० १. पा० १. सू० ५.) ह्या महत्वाच्या सूत्राचा भावार्थ इतकाच कीं, शब्दाचा व अर्थाचा परस्पर संबंध नित्य आहे. ह्या नित्यसंबंधाचें जें ज्ञान तोच उपदेश असून, त्या उपदेशाला कर्धीच विप- र्यय नाहीं. मात्र, अर्थाच्या अज्ञानानें विपर्यास होतो. या साठी, बादरायणाच्या मताप्रमाणें उपदेश प्रमाण आहे. कारण, त्याला प्रत्ययान्तराची अथवा दुसऱ्या ज्ञानाची अ वश्यकताच नाहीं. ह्यावरून, शब्दोच्चार होतांच अर्थ उत्पन्न होतो, हें प्र- तिपादन मीमांसकारांनी सिद्ध केले आहे. म्हणजे, शब्दो- चाराला अर्थात्रांचून गतिच नाही, हे उघड होय. तात्पर्य, शब्दाचा अर्थ निल असल्याकारणानें, त्याचें शब्दाचें मूल्य. मूल्य, त्याचे महत्व, आणि त्याची उपयुक्तता, ही निःसंशय अपूर्व आहेत; व यासाठींच, प्रभा- कर भट्टादि मीमांसकांनी, मीमांसेंतील संहा प्रमाणांतच शाब्दाची देखील गणना केली आहे. १ सहा प्रमाणे खाली लिहिलेली होतः- - १ प्रत्यक्ष २ अनुमान, ३ उपमान, शाब्द, ५ अर्धापत्ति, व ६ अभाव. माधवाचार्यांनी आपल्या जैमिनीय न्यायमालाविस्तारीत अर्से प्रतिपादन केले आहे की, प्रत्यक्ष व २ अनुमान, ही धर्मविचारीत प्रमाणेच नाहीत.