या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपात, ध्वाने, शब्द, व श्रवणविचार. ७५ सूतसंहितेवर टीका करतांना, माधवांनी आचार्योच्या आचार्य मत. श्लोकाचें अवतरण, आपल्या प्रकृत विषयाच्या पुष्टीकरणार्थ केले आहे; आणि त्यांतही वर्णा- दुमक वाचेच्या उत्पतीचें स्थान, व तिच्या उद्गमाचे प्रकार सांगितले आहेत. मूलाधारात्मथममुदितो यस्तु भावः पराख्यः पश्चात्पश्यंत्यथ हृदयगो बुद्धियुमव्यमाख्यः | वक्त्रेवैखर्यथ रुरुदिपोरस्यजन्तोः सुषुम्णां बद्धस्तस्माद्भवति पवनः प्रेरितो वर्णसंज्ञः ॥ श्रीशंकराचार्योचा काळ म्हटला म्हणजे, इ० स० चे आठवें शतक होय. तसेच, ह्या वाग्देवीच्या प्रचंड प्रभावाबद्दल भवभूति भवभूतीची उक्ति कवीस मोठी धन्यता वाटून, त्यानें आपल्या सुप्रसिद्ध व जगन्मान्य उत्तररामचरित नाटकांत, तिच्याविषयीं मोठ्या गौरवानें आणि आदरपूर्वक लिहिले आहे. कामान् दुग्धे विमकर्षत्यलक्ष्मीं कीर्तिसूते दुष्कृतं या हिनस्ति । तांचाप्येतां मातरं मंगलानां धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः || ( उत्तररामचरित अंक १ ) हूं। कविपुंगव इ० स० च्या आठव्या शतकांत उदयास आला असून, त्याच्याही पूर्वी आ- णखी एका रसिक व मर्मज्ञ कबीनें, ह्या वाग्देवीच्या संबंधानें लिहून, तिळा सर्व भूषणांच्या अगदर्दी शिरोभागींच बसविलें आहे. चाणीच्या संबंधाने भर्तृहरीचा अभिप्राय