या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ भाषाशास्त्र. केयूरा न विभूषयन्ति पुरुषं द्वारा नचन्द्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता पूर्वजाः | वाण्येका समलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते श्रीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ।। (भृर्तहरिकृत ना तक. ) ह्या कविवराचा कालं अद्यापि निश्चित झालेला नाही. तथापि, हा भर्तृहरि विक्रमादित्याचाच भाऊ असून, तो इ० स० पूर्वीच्या पहिल्या शतकांत उदयास आला होता, असे कित्येकांचें मत आहे. तेव्हां अर्थातूच, लाला होऊन आज जवळ जवळ दोन हजार वर्षे झाली, हे उघड आहे. सबब, तितक्याही पुरातनकाळी, भाषेच्या संबंधानें भामचे किती उदात्त विचार असत, है कोणाच्याही लक्षांत सहजों येईल. पण भाषेच खरे स्वरूप, आणि वाचेचा नितान्त महिमा, यांचा पूर्ण संस्कार आमच्या पूर्वजांच्या छत्पटिकेवर, भर्तृहरीच्याही पूर्वी अ नेक शतकें झाला होता, यांत लेश- मात्र देखील शंका नाहीं. कारण, त्याचें प्रत्यक्ष प्रमाण, अथर्ववेदासारख्या पुराणतर ग्रंथांतच आपणांस उपलब्ध होते. अथर्ववेदांत भाषेला दैवतपदाप्रत चढविले असून, तिला वाग्देवी अशी संज्ञा दिली आहे; तद्विषयक अथर्व वेदातील वर्णन. १ भर्तृहरीच्या काळायद्दल केलासवासी नामदार काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांनी पुष्कळ ऊहापोह केला आहे. (ह्यांनी संशोधन केलेले शतक पहा.) Vide also, Max Muller's “ What cau India Teachr us ? " First Edition. P. P. 310-338 @ 350.