पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आली आली लक्ष्मीबाई चालली गाईच्या गोठा
दिली भक्ताला हाक सोन्याचं तेच फाकं
माझी लक्ष्मीबाई....

ती जिथे जिथे फिरते तिथे तिची पावले रेखतात. पावलांचे रेखाटन सर्वसाधारणपणे असे असते.

 या तीनही आकृतीत भरलेले मापटे, त्यातील धान्य, दिवा असे संकेत मिळतात.
 ७. लक्ष्म्यांच्या पोवत्यात गाठी मारताना ज्या वस्तू बांधतात त्यांत रेशीम, घोंगडीचा लोकर, धागा, हरळी,आघाडा, धोतऱ्याचे फूल, झेंडूचे पान, लवंग, खोबर, आदींचा समावेश असतो. आघाडा, हरळी जमिनीत रुजल्या की वाढतच जातात. जमिनीचा कस वाढविणाऱ्या या वनस्पती. रेशीम आणि लोकर चिवट आणि लांबत जाणारे धागे. ८. लक्ष्म्यांचे निर्माल्य, उरलेले अन्न, पोवते शेतात नेऊन पुरतात. या जणु सुबत्तेच्या खुणा. त्या शेतात पुरून शेताची सुफलन शक्ती वाढवावी ही त्या मागची सद्भावना.
 जमीन आणि पाणी यांच्या एकरूपततेतून -
 पाणी असेल तरच जमिनीची उर्वराशक्ती सुफलित होणार. कोकणात, वऱ्हाड, खानदेशात गौर पाण्याजवळ नेऊन विसर्जित केली जाते. मराठवाड्यात मात्र मुखवटे सन्मानाने उतरवून तुळशीपर्यन्त नेतात. मराठवाडा तसा नेहमीच दुष्काळाच्या छायेखाली. त्यातही शेकडो वर्षे निझामशाहीच्या अमलाखाली असणारा भूभाग. त्यामुळे काही रीतीत फरक आहे. कोकण, वऱ्हाड, कोल्हापूर या प्रदेशातील स्त्रिया गौर मिरवीत पाण्यापर्यंत नेतात.
 ज्येष्ठाकल्पातील ज्येष्ठेचे रूप -
 विघ्न देवतांचे विश्व या टिपणांत रा.चिं.ढेरे नोंदवितात की मध्ययुगात सारा

भूमी आणि स्त्री
२०३