प्रमाणे सुजानें तिकडे जाऊन किल्लयास वेढा घातला; तेव्हां मुरारपंतानें
किल्लयांतील लोकांच्या मदतीस आणखी फोज रवाना केली; मोंगल सैन्याश
युद्ध चालविले; आणि आपल्या बाजूने उठावणी करून मोंगलांस पायबंद
बसविण्याविषयीं शहाजीस निकडीची पत्रे रवाना केली.
शहाजीस ही हकीकत कळल्याबरोबर त्यानें अहंमदनगरजवळ मोठी
फौज जमविली; दौलताबाद व बेदर या प्रांतांवर स्वारी करून तिकडील
प्रदेश लूटून फस्त केला; मोंगल लष्कराकडे जाणारी धान्यसामुग्रीची कार-
बानें रस्त्यांतच लुटलीं; आणि त्यांचे दळणवळणाचे सर्व मार्ग बंद करून
मोंगली सैन्यास अतीशय त्रास दिला. तेव्हां मोहबतखानाने त्याच्यावर पुन्हो
स्वतंत्र सैन्याची रवानगी केली; परंतु हें सैन्य नजदीक आल्याबरोबर शहा-
जीने लागलीच डोंगरी प्रदेशाचा आश्रय घेतला; त्यामुळे त्या सैन्यास तसेंच
परत जावें लागलें; इकडे, हें सैन्य परत गेल्याबरोबर शहाजीनें पुन्हां
लागलीच मोंगल सैन्यास त्रास देण्यास सुरुवात केली; आणि चोहोकडून पूर्ण
नाकेबंदी करून सुजा व त्याचे मोंगली सैन्य उपाशी मरण्याचा प्रसंग आणिला.
त्यामुळे त्या सैन्याचे अतीशय हाल होऊ लागले; आणि त्यांतच अदिलशाही
सैन्यानेही बाहेरून सारखा उपद्रव दिला; त्यामुळे अखेरीस नाइलाजानें-
पुष्कळ नुकसान सोसून व अपयश घेऊन - वेढा उठवून ( इ० सन १६३४;
मे ) सुजा यांस आपल्या सैन्यासह बहाणपुरकडे परत जाणे भाग पडले.
ही हकीगत शहाजहान यांस कळल्यावर तो अतीशय संतापून गेला;
गनीमीकाव्याच्या युद्धानें सतत दहा वर्षे आपल्या सैन्यास शहाजीनें अतीशय
सतावून सोडिलें, याबद्दल त्यास शहाजीचा अतीशय राग आला. आपण नाम-
शेष केलेली निजामशाही शहाजीनें पुन्हां उभी केली,आपला सर्व खटाटोप
व्यर्थ झाला, यामुळे शहाजद्दान चिडीस गेला; विजापूरकर व गोवळकोंडेकर
या उभयतांकडून शहाजीस मिळणारी मदत बंद पाडण्याकरितां दक्षिण प्रांताचा
ह्याकाळापर्यंत फक्त एकच " खानदेश " या नांवाचा सुभा होता तो मोडून
दौलताबाद व अहंमदनगर हे दोन भाग केले; ( इ० सन १६३४ ), खान
डौरान व खान झमन या दोन सरदारांना त्यांच्या बरोबर पुष्कळ सैन्य देऊन