गडच्या माचीचा आश्रय घेऊन तिकडील सर्व मार्ग बंद केले; त्यामुळे खान
जमानाचा नाइलाज होऊन तो अहंमदनगर येथे परत आला, व शहाजी
तेथून निघून पुण्याजवळ येऊन राहिला.
इकडे शहाजीचा मुलगा संभाजी हा संगमनेर येथे तळ देऊन राहिला
होता, त्याच्यावर शाइस्तेखानानें स्वारी केली; ( इ० सन १६३६ मार्च )
व त्यास तेथून हुसकावून लाविलें; तेव्हां संभाजी नाशीक येथे गेला; त्याच्या
÷ नाशीक, है शहर इ० सन १८६९ पासून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण
झालें आहे; व ऐतिहासिक व धार्मिक दृष्टया है शहर महत्वाचे असून तें गोदावरी
नदीच्या कांठी वसलेले आहे; नदीचा प्रवाह शहराच्या उत्तर व पूर्व दिशेनें
वहात असून हे शहर जी. आय. पी. रेलवेच्या नाशीकरोड स्टेशन पासून
पांच मैलांवर आहे. पुराणांतरी या शहरास पद्मनगर, त्रिकंटक, व जनस्थान
अशीं नांवें दिलेली असून मुसलमानी अमलांत त्यांस " गुलछनाबाद " हें
नांव होतें. त्यावेळी शहराला गढी व तट होता; तो आतां अगर्दी पडला
असून तटाचे भगूर दरवाजा, त्रिंबक दरवाजा, आसराची वेस, त्या वेशी अद्यापि
कायम आहेत. ह्या भागास "जुने नाशीक" असे म्हणतात. या भागांत जुम्मा
मशीद व पीर जाद्यांचे थडगें असून त्यांस सरकारी नेमणूक आहे; शिवाय
" जोग” ह्यांच्या वाड्यांत मदिना येथून सोळाव्या शतकांत आलेल्या शादक-
शाह हुसेनी या साधूचें थडगें असून त्याचा दरवर्षी मोठा उरूस भरत असतो.
नाशीक हॅ शहर इ० सन १७६२ पासून, म्हणजे पहिल्या माधवराव पेश-
व्याच्या कारकीर्दीपासून, विशेष भरभराटीस येण्यास प्रारंभ झाला; पेशव्यांनीं
आपणांस राहण्याकरितां तेथे एक वाडा बांधला, व ते मधून मधून तेथे येऊन
राहू लागले. ह्या वाड्यास " पेशव्यांचा वाडा अथवा सरकारवाडा
अर्से म्हणतात. ह्याचे बांधकाम, व चौथन्याचा गुळगुळीत व तोंड दिसण्या-
इतका सफाईदार दगड, हे पाहण्यासारखें आहे; पेशव्यांनी गंगेवरील कोट,
घाट व पटांगण ही बांधली आहेत; ह्या भागास "नवें नाशीक " असे म्हणतात.
त्याचे " नाव दरवाजा "" दिल्ली दरवाजा मल्हार दरवाजा " वगैरे