स्वानजमान यानें शहाजीचा नाद सोडला; व तो उत्तर कोंकणांतील शहाजीच्या
ताब्यांतील सर्व किल्ले आपल्या हस्तगत करून घेण्याच्या उद्योगास
लागला. व माहुलीचा किल्ला हस्तगत करून घेण्याकरितां तिकडे वळला. तेव्हां
त्या ठिकाणी शहाजीचें कुटुंब - जिजाबाई, बालशिवाजी व मूर्तुजाशहा ह्रीं
रहात असल्यामुळे शहाजीस किल्ल्याच्या संरक्षणाकरितां तिकडे जाणे भाग
पडले. त्याप्रमाणें शहाजी हा माहुली येथे येऊन पोहोंचला; तोच खानजमान तेथे
येऊन दाखल झाला; तेव्हा शहाजी माहुली सोडून मनरंजनच्या किलशावर
गेला. तेथेही सारख्या जोराच्या पावसांत चिखलांतून मोंगल फौंज दौडत
आली; व तेथें उभयतांमध्ये एक लद्दानशी चकमक झडली; व मोगलांनी
निजामशहाची छत्री, नौवत, पालखी वगैरे सामान व घोडे, उंट वगैरे जनावरें
पकडली; तथापि शहाजी तेथून निसटला व पुन्हां माहुली येथे परत आला.
त्याच्या पाठोपाठ खानजमानही त्या ठिकाणी येऊन दाखल झाला. त्यानें
लागलीच किलपास वेढा दिला; मोर्चे बांधिले; व किल्ला हस्तगत करून
घेण्याचा मोठ्या निकरानें उद्योग आरंभिला.
इकडे शहाजीनें माहुलीच्या किल्लयांत आल्यावर, खानजमान येऊन
पोहोचण्याच्यापूर्वीच किल्ला लढविण्याची तयारी केली होती; व त्याप्रमाणें
त्यानें कांहीं दिवसपर्यंत मोंगल व विजापूरकरांच्या एकवटलेल्या सैन्यास दाद
न देता मोठ्या मर्दुमकीनें किल्ला लढविलाही, परंतु अखेरीस किल्लयाच्या
माचीलगत धान्याची कोठारें होतीं, तीं मोगलांनी लुटिलीं; त्यामुळे उपासमार
होण्याचा प्रसंग येऊन शहाजीचा सर्वस्वी नाइलाज झाला. यावेळी शहाजीचा
पुरस्कर्ता विजापूरकर सरदार रणदुल्लाखान हा खानजमानबरोबर युद्ध भूमी-
वर असून, तो मोंगलाशी तह करण्याबद्दल शहाजीस सारखा आग्रह करीत
होता. अखेरीस याच्याच मार्फत शहाजीनें खानजमानार्शी तहाचें बोलणें
सुरू केले; परंतु नवा सुलतान मूर्तुजा निजामशहा, व सिंहगड, पुरंदर, लोहगड,
माहुली, शिवनेरी, व त्रिंबक या सहा किल्लयांच्या सोडचिठ्ठधा, शहाजीनें
पहिल्यानें आपल्या स्वाधीन केल्याशिवाय खानजमान हा त्यास तिळमात्रही
सवलत देण्यास तयार नव्हता; त्यामुळे अखेरीस मूर्तुजा निजामशहा, व उपरी
८