सशा प्रकारचा हा समारंभ होता. त्यानंतर, अदिलशहानें, पुर्णे, सुपें, इंदापूर,
बारामती, व चाकण, वगैरे प्रांताची जी जहागीर निजामशाहीतून शहाजीकडे
चालू होती तीच, त्याच्याकडे चालू ठेविली. आणि निजामशाहीतील, भिमा
च निरा या दोन नद्यांच्या मधील मोंगलाकडून मिळालेल्या नवीन प्रदेशाची
व्यवस्था लावण्याकरतां मुरार जगदेव x याच्या मदतीस त्यास पाठविलें.
शहाजीस या प्रदेशाची उत्तम माहिती होती; त्यामुळे मुरारपंतास त्याचा
अतीशय उपयोग झाला; व ही कामगिरी शहाजीनें उत्तम प्रकारें बजाविली.
याबद्दल मुरारपंतानें त्याची शहाजवळ अतिशय तारीफ केली. त्यानंतर शहानें
कर्नाटक व द्रवीड प्रांतांतील जो नवीन प्रदेश त्यास मोंगलाकडून मिळाला
होता त्याचा बंदोबस्त करून तिकडील व्यवस्था लावण्याकरितां रणदुल्लाखान
यास तिकडे पाठविले. तेव्हा त्याच्या हातांखाली शहाजीस नेमून त्याचीही
तिकडे रवानगी केली ( इ. सन १६३७ ). त्यावेळी नारो त्रिंबक हणमंते
यास त्याने आपला कारभारी म्हणून बरोबर नेलें होतें. कर्नाटक प्रांती गेल्या-
चर रणदुल्लाखान यानें तिकडील मुख्य पाळेगार केंपगौडा याच्यावर स्वारी
केली. तींत त्याचा पूर्ण पराभव केला; त्यास सावनदुर्गच्या + किल्लयांत हांकलून
लाविलें; कावेरी नदीच्या उत्तरेकडील सर्व प्रदेश जिंकून घेतला; व त्याचें
राहाण्याचे मुख्य ठिकाण बंगळूर, इस्तगत करून घेऊन तेथेंच तो राहूं
लागला (इ. सन १६३८). या मोहिमेत शहाजीनें उत्तम कामगिरी बजाविल्यामुळे
अदिलशहानें त्यास कर्नाटक मधील बंगळूर, कोलार, होसकोट (ऊसकोटा), दोड्ड-
x मुरार जगदेव व वजोर खवासखान, या उभयतांना महंमद
अदिलशहा यानें इ० सन १६३५ मध्ये ठार मारिलें; त्यामुळे जरी मराठी
बखरीत मुरारपंताचें नांव दिले आहे तरी हा दुसरा कोणी सरदार असावा
असे दिसते.
+ सावनदुर्गचा डोंगरी किल्ला म्हैसूर प्रांतांत बंगलोर जिल्ह्यांत
असून तो समुद्रसपाटीपासून अजमायें ४०२४ फूट उंचीवर आहे. व त्याचें
मागाडी ( Magadi) हें स्थानिक नांव असून या किल्लयाचा घेर अजमास
आठ मैलांचा आहे.