बाळापूर, व शिर्के हे पांच प्रांत जहागीर दिले. व पुढे रतनपूर, देवगड, कनकगिरी, व
राजदुर्ग हे चार परगणे अदिलशहानें शहाजीस दिल्यानें तेंही लाच जहागीरीत पुढे
सामील झाले. शिवाय अदिलशहानें त्यास इंदापूर, बारामती, व मावळ प्रांत
जहागीर दिला; कन्हाड प्रांतांतील बावीस गांवांची देशमुखी दिली; आणि
रणदुलाखान हा कर्नाटक प्रांतांमधून इ. सन १६३९ च्या सुमारास परत
गेल्यानंतर शहानें त्यासच त्या प्रांताचा मुख्य अधिकारी नेमिले. या वेळेपा-
सून शहाजी कर्नाटक प्रांतामध्यॆच स्थाईक झाला; तथापि पहिल्या पहिल्यानें
पर्जन्यकाळी विजापूर येथें छावणीस यावें, व पर्जन्यकाल खलास झाल्यानंतर
पुन्हां कर्नाटकांत मोहिमेवर जावें असा शहाजीनें कांहीं वर्षे क्रम ठेविला.
तथापि पुण्याकडील जहागिरीवर त्याची विशेष भक्ति असून जिजाबाई व बाल-
शेवाजी त्या ठिकाणी रहात असत. "जिजाबाईची त्यावेळी सुमारे चाळिशीची
उमर असून, ह्यापुढे तिला संतति झाली नाही. संभाजी, शिवाजी, व एक
मुलगी अर्शी तीनच अपत्ये तिचीं जगली होती. आणिक चार पांच अपत्यें
तिला झाली म्हणून बृहदांश्वर शिलालेखकार लिहितो. तीं सर्व लहाणपणींच
निवर्तली. शके १५२५ त लग्न झाल्यापासून शके १५५८ त शहाजी विजापुरास
जाई तोपर्यंतच्या तेहतीस वर्षांत शिंदखेड, दौलताबाद, अहंमदनगर, परांडा,
भीमगड, संगमनेर, त्र्यंबक, वैजापूर, जुन्नर, पुणे, कोंडाणा, व शेवटी माहुली
अशा अनेक स्थलांचीं ऐश्वर्ये, संकटें, पळापळी, घराधरी, लढाया, खून, छापे,
द्वंद्वयुद्धे इत्यादि भारततुल्य प्रसंग पाहून व सोहाळे भोगून शहाजीच्या धोर
णाचा तिला पूर्ण अभ्यास व अनुभव आला होता. एक लढण्याची कला
सोडून दिली तर बाकीच्या बहुतेक सर्व राजकीय कला शहाजीच्या इतक्याच
तिच्या आंगवळणी पडल्या होत्या. अकबर, जहांगीर, शहाजहान, इब्राहीम अदिल-
शादा, महंमद अदिलशादा, चांदबिबी, मलिकंबर,
चांदबिबी, मलिकंबर, फत्तेखान, लोदी,
मोहबतखान, नूरजद्दान, आसदखान, खवासखान, मुस्तफाखान, मूर्तुजा
निजामशाहा, मासाहेब, बडी साहेबीण, मुरारपंत, चतुर साबाजी, ह्या
मोंगलाई, निजामशाही व आदिलशाही प्रसिद्ध व्यक्तींचे गुणदोष तिनें प्रत्यक्ष
पाहिले असून मालोजी, शहाजी, विठोजी, खेळोजी, लुकजी, अचलोजी,
इत्यादि सासरमाहेरच्या मंडळींच्याहि प्रकृत्या तिनें अनुभविलेल्या होत्या.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११६)