नवरा मोहिमेवर असतांना त्याच्या बरोबर तिनें लढाया पाहिल्या होत्या, व
बरोबर नसल्या वेळी न्यायमनसुची केलेली होती. अशा ह्या कर्त्या व पोक
बाईच्या हवाली पुण्याकडील जगाहीर करून, दादाजी व सोनोपंत या वृद्ध
मुत्सद्यांच्या सल्ल्याने शिवाजीचें व जहागिरीचें पालनपोषण करण्यास ह्या
बाईस शहाजीनें आपला प्रतिनिधी नेमिले, व निर्धास्त अंतःकारणानें विजा-
पूरचा रस्ता धरिला. शिवाजीचे वय ह्या वेळी नऊ वर्षांचे असून जिजाबाई
व शहाजी यांच्या बरोबर दौलताबादेपासून माहुलीपर्यंतच्या स्थळी त्या त्या
कालीं तो होता ” ( रा. मा. वि. चंपू राजवाडे; ). शहाजीनें दादोजी कोंड-
देव या नांवाच्या एका हुषार, विश्वासू, इमानी, व वृद्ध मुत्सद्यास आपल्या
पुण्याकडील जद्दागिरीचा कारभारी नेमिले, तेव्हांच सिद्दी हिलाल या
नांवाच्या एका मनुष्याची त्यानें दादोजीच्या हाताखाली नेमणूक केली; त्याच्या
दिमतीत एक हजार स्वार देऊन, त्याच्यावर तेथील बंदोबस्ताची काम•
गिरी सोपविली; त्याप्रमाणेच कर्नाटक प्रांतांत नारोपंत हणमंते याच्या मदतीन
त्याने तिकडील प्रांताची सुव्यवस्था करण्याचा उद्योग आरंभिला, व त्यांत तो
यशस्वी होऊन त्यानें लवकरच तिकडील प्रदेश भरभराटीस आणिला.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११७ )