पहात होता, त्याच्यावर तो चाल करून गेला; इतक्यांत सिद्दी रैहान यानें
दामलवाड याच्या पिछाडीवर हल्ला करून त्यास ठार केले. त्यामुळे हिंमत
खचून बेदनूरकरांचे सैन्य त्या ठिकाणाहून आपला जीव घेऊन पळालें, व
अदिलशाही सैन्यास विजय प्राप्त झाला.
तथापि ह्या विजयाचें यश कोणी मिळविलें, हा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धास सुर
वात झाल्यावर या युद्धाचा सर्व भार प्रारंभी शहाजी व आसदखान या उभय-
तांच्या सैन्यावर पडला, व त्यांत जरी आसदखान जखमी झाला तरी त्याब
रोबरच त्या उभयतांच्या सैन्याशी झगडण्यांत दामलवाड याची बहुतेक सर्व
शक्ति खर्च होऊन गेली, व त्यामुळेच सिद्दी रैहन याला दामलवाडावर जय
मिळविता आला. अशी स्थिति असल्यामुळे शहाजी व आसदखान यांच्या
पक्षांतील मंडळी आपण जय मिळविला, असें म्हणूं लागली, व सिद्दी रैहन
हा तो मान आपला आहे, असे म्हणूं लागला; अखेरीस हा वाद निवाड्या-
करितां मुस्तफाखानापुढे आला; परंतु त्यानें स्वतःच सर्व युद्धचमत्कार अव
लोकन केलेला असल्यामुळे कोणत्याही एका पक्षाची त्याला तरफदारी करतां
आली नाहीं; त्यामुळे अखेरीस दोन्हीही पक्ष नाखुष झाले. त्यामुळे सिद्दी
रेहन व मुस्तफाखान यांचे वाकडे पडले; त्यामुळे, शहाजी अंतस्थरोत्या बेद-
नूरकराला सामील आहे, हा मुस्तफाखानाचा संशय दृढ झाला; शहाजीनें
ह्या एकंदर मोहिमेंत अंगचोरपणा केला, बेदनूरकरांचा जितका पक्का बंदो-
बस्त करावयास पाहिजे होता, तितका केला नाहीं, असें मुस्तफ खानास
चाटले. त्यामुळे शहाजी व मुस्तफाखान यांच्यांत पूर्वीपासूनच वैमनस्य होतें,
ते अधिक दुणावलें; मुस्तफाखानाने शहाजीच्या हालचालीवर नजर ठेवण्या-
करती आपल्या हाताखालील सरदारांस हुकूम केला व त्यानंतर लवकरच
( इ. सन १६४८ ) मुस्तफाखान हा शिद्दी रहानसह जिंजी ऊर्फ चंदांकडे
व शहाजी हा आपल्या जहागिरीत जाऊन राहिला.
परंतु याच वेळेपासून शहाजी व मुस्तफाखान या उभयतांमधील वैमनस्य
परमावधीस पोचलें; शहाजी मुस्तफाखानाचे हुकूम मानीनासा झाला; मुखत्या
रीने वागू लागला; मुस्तफाखानानें “शहाजी आपला म्हणजे अदिलशहाचा हुकूम
मानीत नाहीं; " अशी महंमद अदिलशहाकडे तक्रार केली; महमंदशहा हा