स्वरूपाची कीर्ति दिल्लीचा बादशादा अल्लाउद्दीन खिलजी ( कारकीर्द इ. स.
१२९६ ते इ. स. १३१६ ) याच्या कानावर गेली; तेव्हां त्याने तिच्या
अभिलाषानें मेवाड प्रांतावर स्वारी केली आणि त्यानंतर रजपूत व मुसल
मान यांच्यामध्ये भयंकर रणकंदन माजून अल्लाउद्दीन यानें अखेरीस चितोड.
गड आपल्या हस्तगत करून घेतला ( इ. स. १३०४). त्यावेळी आपल्या
चंशाचा समूळ नाश नाश होऊं नये म्हणून लक्ष्मणसिंहानें आपला दुसरा व
सर्वांत आवडता मुलगा अजयसिंह यांस आपणाजवळ बोलावून घेतलें; व
त्यास आज्ञा केली कीं, आपल्या घराण्याचे निर्मूलन होणे कोणत्याहि
प्रकारें इष्ट नाहीं; म्हणून तूं ताबडतोब या ठिकाणाहून निघून केलवाडा
"या नांवाच्या अवघड व बळकट ठिकाणी जाऊन आपल्या प्राणाचे रक्षण
करावेस; " अल्लाउद्दीनच्या सैन्याबरोबर आपण दोन हात करावे, अशी
अजयसिंहाची फार इच्छा होती; त्यामुळे स्वतःच्या प्राणाचे रक्षण करण्या-
करितां पळून जाणे त्यास पसंत नव्हतें; तथापि वडिलांनीं फारच आग्रह
केल्यामुळे तो अखेरीस नाइलाजानें आपल्या वडील बंधूचा अज्ञान मुलगा
हमीरसिंह ऊर्फ हम्मीरसिंह यांस बरोबर घेऊन कैलवाडा येथे गेला, व
इकडे रजपुतांचा भयंकर प्राणनाश होऊन चितोडगडावर मुसलमानी अंमल
सुरू झाला.
अजयसिंह हा हमीरसिंहास बरोबर घेऊन कैलवाडा येथे गेल्यानंतर
त्यानें त्या ठिकाणी एक बरेंच मोठे सैन्य जमविलें; आणि मुसलमानांच्या
ताब्यांत गेलेल्या आपल्या वडिलांच्या राज्यापैकींचा बराच प्रदेश त्याने पुन्ह
कैलवाडा, हा खेडेगांव उदेपूरच्या राज्यांत पश्चिम सरहद्दीवर, अर-
वली पर्वताच्या आंतील भागांत कुमलगड या नांवाच्या प्रसिद्ध किल्ल्याच्या
पायथ्याशी वसलेला आहे. हा किल्ला महाराणा कुंभ यानें पंधराव्या शतकांत
बांधिला असून तो अतिशय मजबूत, चढण्यास अवघड व समुद्रसपाटी-
पासून अजमार्से ३५६८ फूट उंचीवर आहे.