महंमद आदिलशाच्या बाबतीतही घडून आला; शिवाजीनें उडविलेल्या एकंदर
धुमाकुळाची बातमी आदिलशहास कळल्यावर त्यानें शिवाजीस आवरण्याबद्दल
शहाजीस धमकी दिली; “तुम्ही पादशाही चाकर, आणि शिवाजी (तुमचा )
लॅक पुण्याकडे पाठवून यांणी पादशाहाशीं बदलून हरामखोरी केली. चार किल्ले
पादशाही घेतले. देश मुलूख काबीज केला, व मारिला. एक दोन राज्ये
बुडविलीं, व एक दोन राजे पातशाही रुजुवात (बादशाहाशीं राजनिष्ठ) होते ते
मारिले, आतां लेकास कैदवार ठेवणें ( आतां शिवाजीस आपल्या ताब्यांत
ठेवावें) नाहींतर पादशाही इवाला घेतील. " असें शहाजीस धमकीवजा पत्र
पाठविलें त्यावर शहाजीनें आदिलशहास असें स्पष्ट कळविले की, " शिवाजी
आपला पुत्र परंतु आपणाजवळून पळोन गेला; तो आपल्या हुकुमांत नाहीं.
आपण तो पादशाहाशीं रुजवात एकनिष्ठेने आहों. शिवाजी आपला पुत्र,
याजवरी हल्ला करावी. मन मानेल तें करावें. आपण दरम्यान येत नाही. "
परंतु शहाजीच्या ह्या उत्तरानें अदिलशहाचें बिलकुल समाधान झालें नाहीं;
शिवाय " शिवाजीच्या बंडाळीस शहाजीच कारणीभूत आहे, त्याचीच
शिवाजीस गुप्त रीतीनें फूस, मदत व उत्तेजन आहे, आणि खुद्द शहाजी-
चाही स्वतंत्र राज्य स्थापना करण्याचा मनापासून उद्योग सुरू आहे अशा-
बद्दल अदिलशद्दास स्वतंत्र पुरावा मिळाला; + त्यामुळे तर शहाजीची या
+ ह्या बाबतीत म्हैसूरच्या इतिहासांत (Wilke's Mysore; Vob. I
पहा.) असा उल्लेख केलेला आहे कीं, जेव्हां आदिलशाही सैन्यास शिवाजी
मोजीनासा झाला व बादशाही सत्तेसही त्यानें धाब्यावर बसविले, त्याच वेळी
लागलीच "शिवाजीचे हैं अनियंत्रित वर्तन ताबडतोब बंद करावें" अशी अदिल-
शहाने शहाजीस ताकीद दिली. त्याच वेळी विजापूर दरबारांतील कित्येक
लोक तर उघड उघड असेंही बोलू लागले की, शिवाजीच्या ह्या सर्व वर्त-
नास अंतस्थरीत्या शहाजीचीच फूस आहे. तथापि शहाजीनें कानावर हात
ठेवून अदिलशहास असे कळविलें कीं, " मी दुसरे लग्न करण्यापूर्वीच माझी
पहिली बायको व हा मुलगा ( शिवाजी ) यांच्याबरोबरील धर्मशास्त्रानुरूप
९