(१३६)
बद्दल त्याला मोठाच विचार उत्पन्न झाला. त्याला स्वतःलाही प्रारंभी
आदिलशहानें विजापूर येथें बोलाविलें होतें, आणि खुद्द शहाजीकडूनही
त्यास विजापूर येथे निघून येण्याबद्दल पत्र पाठविलें होतें. परंतु माता
जिजाबाई व पत्नि जिजाबाई, व इतर मंडळींनी त्यास विजापूर येथें
जाण्याची सल्ला दिली नाहीं म्हणून त्यानें तो बेत टाळला; मोंगल बादशहा
शहाजहान यांजकडे वकील पाठवून व त्याच्यामार्फत, आपण बाद.
शाही नौकरी करण्यास तयार भाहों " असे बादशहास, व त्याचा दक्षिण
प्रांताचा सुभेदार असलेला मुलगा शहाजादा मुरादबक्ष यांस कळवून
तिकडे संधान बांधिलें; व आदिलशाही प्रदेशांत धुमाकूळ माजविण्यास सुर-
वात केली. तेव्हां महंमदशदानें बल्लाळ बेडर, फत्तेखान व मुसेखान या तीन
सरदारांना शिवाजीवर रवाना केले. या वेळी शिवाजी पुरंदरच्या किल्लयांत
होता. त्यामुळे हा किल्ला हस्तगत करून घेण्याची कामगिरी फत्तेखान व मुसे-
खान या उभयतांनी आपणाकडे घेतली व बल्लाळ बेडराकडे, पुरंदरपासून
तीन कोस पलीकडे असलेला शिरवळचा किल्ला हस्तगत करण्याची कामगिरी
सोपविली. त्याप्रमाणे बेडरानें येऊन शिरवळचे ठाणे काबीज केले. या वेळी
शिवाजीचा सरदार भीवराव हा शिरवळच्या आसपास होता; त्यानें शिरव-
ळच्या ठाण्याचे योग्यप्रकारें संरक्षण न करितां तो शिवाजीकडे परत आला;
परंतु हे त्याचें वर्तन शिवाजीस पसंत पडले नाहीं; त्यानें भींवरावास आल्या
पावलानें परतून शिरवळचें ठाणे पुन्हां इस्तगत करून घेण्याचा हुकूम दिला.
त्याप्रमाणे भींवरावाने तिकडे जाऊन मोठ्या त्वेषानें हल्ला चढवून शिरव-
ळचा किल्ला हस्तगत केला; त्या वेळी उडालेल्या चकमकीत बल्लाळ बेडर ठार
झाला, व त्याच्या उरलेल्या सैन्याची पूर्णपणे पांगापांग उडाली. इकडे फत्ते-
खान व मुसेखान यांनी पुरंदरवर हल्ला चढविला; पण तो शिवाजीनें परतून
लाविला; तेव्हा इरेस चढून संधी साधून त्या उभयतांनी पुन्हा निकराचा
इल्ला चढवून ते थेट किल्ल्याच्या दरवाजाशी येऊन भिडले; तेव्हां त्या ऐन
आणिबाणांच्या प्रसंगी शिवाजी आपल्या कांही निवडक सैन्यासह किल्ल्याच्या
बाहेर पडून शत्रूसैन्यावर मोठ्या निकरानें तुटून पडला; व त्या सैन्यास
त्यानें तेथून पिटाळून लाविलें. त्या खणाखणीत मुसेखान प्राणास मुकला, व