आपल्या हस्तगत करून घेतला; व राजनगर* या नांवाचा एक किल्ला
बांधून तेथें आपली राजगादी स्थापन केली. अजयसिंहाचें आपल्या पुतण्यावर
अतीशय प्रेम होतें; त्यामुळे तो वयत आल्यावर अजयसिंहानें त्यास- हम्मीर
सिंहास- गादीवर बसविलें; व आपण सर्व राज्याचा कारभार पाहू लागला.
अशा रीतीने कांहीं काळ लोटल्यावर अजयसिंह मृत्यु पावला. त्याल सज्जन-
सिंह या नांवाचा एक मोठा शूर, कर्तृत्ववान व विचारी मुलगा होता;
त्यानें, आपल्या चुलत भावार्शी राज्याकरितां भांडत बसण्यापेक्षा आपण स्वतःच
एक स्वतंत्र राजगादी स्थापन करावी, असा विचार करून तो दक्षिणेकडे
आला; आणि सौंधवाडा प्रांत काबीज करून तेथें त्याने एका स्वतंत्र राज्याची
स्थापना केली.
या ठिकाणी त्याच्या घराण्याचें चार पिढघा वास्तव्य झालें; सजनसिंहा
नंतर दिलीपसिंहजी, सिंहजी ऊर्फ शिवाजी, भोंसाजी+ व देवराजजी है चार
पुरुष अनुक्रमे राज्यकर्ते झाले. या चारीही राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीत मुख-
लमान लोकांनी त्यांच्यावर अनेक वेळां स्वाच्या केल्या. त्यामुळे त्यांना अतीशय
नास भोगावा लागला. अखेरीस देवराजजी हा इ० सन १४१५ च्या सुमा
रास राज्यत्याग करून नर्मदा ओलांडून प्रथम दक्षिणेत आला; व आपले नांव
बदलून आपणास " भोसावंत भोंसले " असे म्हणवून घेऊं लागला. त्याने
पहिल्यानें कांहीं दिवस कृष्णा व भिमा या नद्यांच्या तीरों पाळेगिरी करून
आपला चरितार्थ चालविला; व नंतर सिंगणापूरची पाटिलकी मिळविली, व
तो तेथें कायमचे वास्तव्य करून राहूं लागला. याच वेळेपासून सिंगणापूर है
भोसल्यांचे मूळ गांव असे मानितात.
- राजनगर हा किल्ला व गांव उदेपूरच्या राज्यांत उदेपूरपासून अज
मार्से चाळीस मैलांवर, उत्तर दिशेस आहे.
+भोंसाजी हा चितोडनजीक भोसावंत म्हणून एक गांव आहे, तेथे येऊन
राहिला होता, त्यावरून, – अथवा “भोसाजी" या नांवाच्या पुरुषावरून त्या
वंशास “भोंसले" हें नामाभिधान प्राप्त झालें, असाहा उल्लेख आढळतो.