बादशहाशीं शत्रुत्व संपादन करून घेण्याचा मार्गही स्वीकारतां येईना
निजामशाहीवर आलेली मोंगलाची घाड महंमद अदिलशहा विसरला नव्हता;
शहाजहाननें निजामशाही राज्य नामशेष करण्याकरितां केवढा अट्टाहास केला
व तें राज्य नष्ट केल्यावरच तो कसा शांत झाला, हे त्याच्या आठवणीत होतें;
तो शहाजहानचा मांडलीक म्हणवीत होता; त्याला अतीशय भीत होता;
आणि शहाजीमुळे शहाजहानशी वैर उत्पन्न केल्यास तो आपली व आपल्या
राज्याची पाळेमुळे खणून काढील, अशी अदिलशहास पूर्ण खात्री होती;
शिवाय तो भोळा व शांत वृत्तीचा असून त्याची प्रकृतिही पुढे सारखी ना-
दुरुस्त राहिल्याने त्याच्यातील हिंमत व तडफ पार नाहींशी झाली होती. आणि
दरबारांतही शहाजीच्या पक्षाची भंडळी असून तो त्याच्या मुक्तनेबद्दल खट-
पट करीत होती. इतक्यांतच ज्याच्या बळावर महंमदशहा उडया मारीत
होता, तो शहाचा बदसल्लागार सरदार मुस्तफाखन हा एकाएकी मृत्यू
पावला; पण शहाजीविषयी त्याच्या मनांत इतका उभा दावा होता की,
मरतांमरतांही " शहाजीवर चांगली नजर ठेवा; " असे सांगून त्याने प्राण
सोडिला ( इ० सन १६४८). मुस्तफाखान मेल्यामुळे तर अदिलशहा अग-
दींच निराधार झाला. शहाजीशी नरम गोष्टी बोलू लागला;तुमच्याकडे
कांदीदी अपराध नाहीं; तुम्हाला पकडण्याचा की मुस्तफाखानाला हुकूम
दिला नव्हता; फक्त दरबारी एकदां येऊन जा एवढाच काय तो निरोप
तुम्हास पोहोचविण्यास मुस्तफाखानास सांगितले होते; परंतु त्यानें बेवकूच
पणानें तुम्हास अटक केली; आतां दिलसफा करून व झाल्या गोष्टी विसरून
जा; मी आपणास कर्नाटकमध्ये परत जाण्याची परवानगी देतों. आपण
उभयतो पुत्रांना अविरून घरा, व आपल्या जहागिरीवर सुखरूप अंमल करा."
अशा गोड, मऊ, व नरम भाषा महंमदशहा वापरूं लागला व त्यानें
शहाजीस बंधमुक्त करून कर्नाटकमध्ये परत जाण्याची परवानगी दिली+
+या वेळी आदिलशाने त्याची सक्त कैद कमी करून त्यास जामिनावर खुलें
केलें; परंतु कर्नाटकमध्यें परत जाण्याची परवानगी न देतां त्यास विजापूर येथेच
आपल्या नजरेखाला ठेविले; त्या ठिकाणी तो इ० सन १६४९ ते इ० सन १६५२