( इ० सन १६४९). त्या वेळीं अदिलशहाने त्यास तीन अटी घातल्या
त्या: - ( १ ) संमाजी अदिलशाही प्रदेशांत पुन्हां घामधूम करणार नाहीं,
अशी तजवीज करावी. ( २ ) शिवाजीनें ह्या वेळेपर्यंत जो अदिलशाही
प्रदेश हस्तगत करून घेतला असेल तो त्याच्याकडून आम्हांस परत देव-
चावा; व ( ३ ) चित्रकलकर नायक बच्चकती भरमा याचा पूर्णपणे बंदोबस्त
करावा. यांपैकी पहिलें व तिसरें कलम शहाजीनें मान्य केले; व दुसऱ्या
कलमासंबंध पूर्वीप्रमाणेच ह्या वेळींही त्यानें शहास असे स्पष्ट सांगितलें
की, " शिवाजी हा माझ्या कह्यांत नाहीं, व तो माझे ऐकेल किंवा न ऐकेल
याचीही मला खात्री देता येत नाहीं. " अर्थात दुसऱ्या कलमासंबंधानें जिम्मा
घेण्याचे शहाजीनें पतकरलें नाहीं; तथापि महंमदशहानें या बाबतीत शिवा-
जीशी शिष्टाई करून खटपट करण्याची कामगिरी पुढे शहाजीवर लादलीच;
नंतर शहाजी कर्नाटकमध्ये परत गेला; त्यानें संभाजीस लागलींच थोपवून
घरिलें, व चित्रकलकर भरमा यांस नामशेष करण्याच्या उद्योगास त्यानें
लागलीच प्रारंभ केला.
शहाजी हा या प्राणसंकटांतून मुक्त होऊन कर्नाटकप्रांती सुरक्षित पोहों-
चला, हे ऐकून शिवाजीस अत्यानंद झाला; परंतु अदिलशहानें घातलेल्या
तीन अटींपैकी पहिले कलम शहाजीनें मान्य करून व दुसऱ्या कलमाच्या
बाबतींत शिष्टाई करण्याचे मान्य करून म्हणजे या दोन मानहानीकारक अटी
पत्करून शहाजाने आपली मुक्तता करून घेतली, याबद्दल शिवाजीस फार
वाईट वाटले; आणि वास्तविक पाहता संभाजीने फरादखानाचा पराभव करून
व आपण मुसेखान, फत्तेखान व बल्लाळ बेडर यांना धुळीस मिळवून, व
अदिलशहाला, शिवाय मोंगल बादशहाकडूनही शह देववून शहाजीच्या
मुक्ततेसंबंधाची तजवीज केली असूनही महंमद अदिलशहाच्या उपरीनिर्दिष्ट
पर्यंत अजमायें चार वर्षे होता; त्यानंतर इ० सन १६५३च्या प्रारंभी आदिल-
शहानें त्यास कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी दिली, व शहाजीची सुटका
महंमदशहानें सन १६४९ मध्ये, (शक १५७१ जेष्ठ शुद्ध पौर्णिमा) विजापूर
- येथें न करतां कोंडाणा ऊर्फ सिंहगड येथे आणून केली, असाही उल्लेख आढळतो.