त्यास भेटण्यास गेला होता. त्यामुळे बंगळूर येथे आल्याबरोबर त्याने पुन्हां
युद्धाची तयारी केली; व सर्जेखानासह तो बेदनूरकरावर चाल करून गेला;
व पुन्हां उभयतांमध्ये अनेक युद्ध प्रसंग झाले. तथापि अखेरीस शहाजीनें
त्याचा पूर्ण पराभव करून त्यास अगदर्दी जेरांस आणिलें; तो दीन झाला;
शहाजीस शरण आला; त्याने विजापूरकरांचा बळकविलेला सर्व प्रदेश सोडून
दिला; व त्या नंतर त्यास एक लहानशी जहागीर बहाल करून आदिल-
शाहाचा अंकित करून ठेवण्यात आले. " हे वृत्त विजापुरीं कळल्यावर आदिल-
शहा बहुत संतोषी होऊन मोठे मरातबांनी पत्र, वस्त्रे, भूषणे अलंकार, हत्ती,
घोडें सुद्धा पाठवून, सर्व अमीर उमराव यांनी तारीफ करून आपापली इकी-
गत स्नेह वादाची लिहून, गौरव केला. फत्ते झाल्यामुळे येथून कूच करून
दुसरी ठाणीं बखेडेदार होती, त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून तुंगभद्रातीरी
बेदिकरें ऊर्फ बसवपट्टण + येथे आले. तेथे अनेक श्वापदें उत्पन्न झाली;
राजांस शिकार करावयाची इच्छा होऊन, घोड्यावर स्वार होऊन हरणाचे
पाठीस लागले. ईश्वरेच्छा, त्या योगे घोड्याचा पाय भंडोळीत अडकून,घोडा
च राजे एकावच्छेदें, पडले; " त्यांत डोक्याच्या कवटीस जखम होऊन ते
गतःप्राण झाले. (शके १५८५ माघ शुद्ध षष्ठी, शनीवार रोजी इ० सन
१६६४ ज्यानेवारी). मागाहून लोक माणसें आली; व्यंकोजी जवळ नव्हता,
सबब भडाझि दिला. व्यंकोजी राजास डाकेने तेथे आणविले; त्यांनी उत्तर-
क्रिया सांग केली. आदिलशाहाकडून दुखवट। येऊन मनसबदारीची वस्त्रे
व्यंकोजींच्या नांवे झालीं. मृत्यूसमयी शहाजीचे वश ७० वर्षांचें होतें; व
शिवाजीनें सुरत है शहर लुटल्याची बातमी त्यास नुकतीच मिळालेली होती.
कर्तव्य करीत असतां, मृत्यू येणें है। खरोखर मोठीच ईश्वरी कृपा होय.
अर्थात् दुखण्याबाइण्यानें व हालयातनेनें खितपत न पडत वीर पुरुषाला
+ हे ठिकाण म्हैसूरच्या राज्यांत, शिमोगा जिल्ह्यांत, हरीहरच्या दक्षि-
गैस अजमायें चाळीस मैलावर आहे. सोळाव्या शतकांत पाळेगारांमधील
तारिकेरे या नांवाचें घराणे या ठिकाणी अंमल चालवांत होते. येथे त्या
काळचा एक किल्ला असून तो हल्ली मोडकळीस आलेला आहे.